
Nashik Water Tanker : जिल्ह्यातील दुष्काळी गावांचे चित्र पालटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (CEO Ashima Mittal) यांनी जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी ‘मिशन भागीरथी प्रयास’ हाती घेतले आहे.
याअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जलसंधारणाची ६०० कामे हाती घेतली आहेत.
कामांची रक्कम सुमारे १०० कोटी रुपये असून यातून पहिल्या टप्प्यात १२ तालुक्यांतील १५० गावांत ५ ते ३० लाखांच्या दरम्यान बंधारे बांधले जाणार आहेत.
गुजरात सीमावर्ती भागातील ५५ हून अधिक गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत, थेट गुजरात राज्याला जोडण्याची मागणी केल्यानंतर, सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते.
त्यानंतर मित्तल यांनी सुरगाणा तालुक्याचा दौरा करत माहिती घेतली. त्या वेळी सुरगाणा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना दिल्या असून तो आराखडा अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळ असतो. येथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी मित्तल यांनी रोहयोतून जलसंधारणाच्या सुविधा उभारण्यासाठी ‘मिशन भागीरथी’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार जलसंधारण विभागाने सर्व तालुक्यांत सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठीची ठिकाणे निश्चित केली. त्यात सुरगाणा, पेठ, सटाणा, दिंडेारी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांमधील १५० गावे निश्चित केली आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.