Bhimashankar Sugar Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Bhimashankar Sugar Factory FRP: भीमाशंकर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित एफआरपी जमा!

FRP Payment: आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफआरपी ३०७९.१२ रुपये येत आहे.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफआरपी ३०७९.१२ रुपये येत आहे.

प्रथम अॅडव्हान्स २८०० रुपये प्रति टन वजा जाता उर्वरित २८० रुपये प्रति टनाप्रमाणे रक्कम ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंगळवारी (ता. ५ मे) वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

बाळासाहेब बेंडे म्हणाले, की उच्च न्यायालय व शासनाच्या निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे.

माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक संचालक आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार हंगामाकरिता देय एफ.आर.पी. ३०७९.१२ रुपये प्रति टन येत आहे.

कारखान्याने हंगामात गाळप केलेल्या उसास प्रथम अॅडव्हान्स रु. २८०० रुपये प्रति टनाप्रमाणे रक्कम अदा केलेली आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याने एकूण ११ लाख ३८ हजार ४९६ टन ऊस गाळप केले आहे.

उर्वरित एफआरपी २८० रुपये प्रति टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार रुपये सोमवारी (ता. ५ मे) वर्ग करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT