Relief For Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Relief For Farmers : शेतकऱ्यांना दिलासा! महापुराने नुकसान झालेल्या पिकांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू

sandeep Shirguppe

Kolhapur Flood Damage : कोल्हापूर जिल्ह्याला जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे २१ हजार हेक्टरवर नुकसान झाले. यावर राज्य सरकारकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. कृषी विभागाकडून पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

याबाबत सर्वाधिक महापुराचा फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यातील ४४ गावांतील १ हजार ३६६ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत आहे. १ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचे वाटप केले जाणार आहे.

जुलैमध्ये कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा या चार नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी व ओढ्यांच्या काठासह सुमारे १० हजार ६०० हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान ऊस व भाजीपाल्याचे आहे. तालुक्यात कोबी, फ्लॉवर, मिरची, दोडका यांसह अन्य पिकांचे व नवीन ऊस लावण केलेल्या शेतकऱ्‍यांना फटका बसला आहे.

पंधरा दिवसांपासून कृषी महसूल विभागाकडून शेतीचे पंचनामे केले आहेत. आता प्रत्यक्षात तालुका कृषी कार्यालयात अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यात २४ हजार ६३४ शेतकऱ्‍यांची १० हजार ६०० हेक्टर जमीन बाधित झाली असून या नुकसानीपोटी २५ कोटी ६७ लाख भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, तालुक्यात ४४ गावांत महापूर आल्याने १ हजार ३६६ कुटुंबांच्या घरात महापुराचे पाणी आले होते. त्यामुळे त्या कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले होते. यात ६८४ पूरग्रस्तांना ६८ लाख ४० हजार रुपये वाटप केले आहे. ६८२ कुटुंबांना ६८ लाख २० हजार जमा करण्यात येणार आहेत. त्याची रक्कम कुटुंबाच्या प्रत्येकी खात्यात १० हजारांप्रमाणे १ कोटी ३६ लाख ६० हजार रुपये आहे.

अकिवाट येथील दुर्घटनेत पाटील व हसुरे या दोघांचा महापुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. दोघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख अशी ८ लाख रुपयांची मदत शासनाकडून दिली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इक्बाल बैरागदार हे अद्याप बेपत्ता असल्याने शासनाने अद्याप कोणताच निर्णय जाहीर केलेला नाही.

शेती नुकसानीचा २५ कोटींवर प्रस्ताव

महापुरामुळे तालुक्यातील १० हजार ६०० हेक्टरमधील पिकांचा चिखल झाला. याचे पंचनामे पूर्ण झाले असून, कृषी विभागाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे. २५ कोटी ६७ लाख रुपये नुकसान झाल्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

याबाबत शिरोळ तालुक्याचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील ४४ गावांचे पुरामुळे नुकसान झाले आहे. घरात पाणी गेलेल्या १३६६ कुटुंबियांना दहा हजार रुपयांप्रमाणे भरपाई दिली जाणार आहे. कृषी विभागामार्फत पंचनामे केले असून, भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे. नुकसान झालेले घर अथवा शेती नुकसानीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT