Soybean Crop : सोयाबीन उगवले, पण उरल्या काड्याच, सोयाबीन उत्पादनावर थेट परिणाम

Kolhapur Soybean Production : कोल्हापूर जिल्ह्यात ४० हजार हेक्टरच्या आसपास सोयाबीन पीक आहे. उसानंतरचे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते.
Soybean Crop
Soybean Cropagrowon
Published on
Updated on

Soybean Farmers Kolhapur : सततच्या पावसाने सोयाबीन पिकाला अतिरिक्त पाणी झाले आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. काही पाणथळ जमिनीत तर सोयाबीन उगवले तरी, आता फक्त तेथे काड्याच शिल्लक राहिल्या आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ४० हजार हेक्टरच्या आसपास सोयाबीन पीक आहे. उसानंतरचे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. दोन वर्षांपासून चांगले उत्पादन येऊनही दराने शेतकऱ्यांना मारले. काही वर्षे अतिवृष्टी आणि महापुराने पिकाचे नुकसान झाले. कापणी वेळी येणाऱ्या अवकाळीने पीक हाताला लागले नाही. यंदाही अतिपावसाचा पिकाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

दिवाळीच्या तोंडावर यंदाचे सोयाबीन पीक शेतकऱ्यांचा हाती लागत असते. सोयाबीनची विक्री करून हा सण साजरे करण्याची पद्धत रूढ झाली आहे. परंतु, याच पिकातून समाधानकारक उत्पन्न हाती पडत नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत जात आहे. यंदाचे चित्रही यापेक्षा वेगळे नसणार असे शेतकरीच आतापासून बोलत आहेत. मुळात सोयाबीनला आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी लागले आहे. शेंगा लागण्याच्या कालावधीत उन्हाची गरज असताना अधून-मधून पावसाचा खेळ सुरू होता. यामुळे शेंगातील दाणे अपेक्षेनुसार धरतात की नाही, याची शंका व्यक्त होत आहे.

विशेषतः पाणथळ जमिनीतील सोयाबीन हाताला लागणार नाही, याची खात्रीच शेतकरी देत आहेत. अशा आणि काळ्या जमिनीतील सोयाबीनची सुरुवातीला उगवण चांगली झाली. परंतु, अतिरिक्त पाण्यामुळे आता त्याच्या काड्याच शिल्लक राहिल्या आहेत.

Soybean Crop
Soybean Market : अकोल्यात सोयाबीनदर पोहोचला सरासरी ४६०० रुपयांवर

पुरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनचे पंचनामे झाले. मात्र, काही भागात पुराचे पाणी आले नाही पण अतिवृष्टीने पीक न उगवल्याने या भागाचे सरसकट पंचनामे झाले नाहीत. मात्र, सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उगवण झाली असली तरी त्यापासूनचे उत्पादन घटणार आहे. यामुळे शासनाने सोयाबीनची सरसकट पंचनामे करण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

भुईमूगही पडले पिवळे

भूईमुगालाही अतिरिक्त पाणी चालत नाही. जादा पाणी लागल्यास हे पीक पिवळे पडते. यावर्षी सततच्या पावसाने या पिकाला अतिरिक्त पाणी झाले आहे. यामुळे भुईमूग पीक पिवळे पडले आहे. परिणामी, कमी शेंगा धरण्याची आणि उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com