Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : दुबार पिके घेण्यासाठी ‘भातसा’तून पाणी सोडा

Team Agrowon

Mumbai News : शहापूर तालुक्यातील भातशेती, भाजीपाल्यांच्या रब्बी व हंगामी लागवडीसाठी भातसा उजवा कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी डिसेंबर महिना सुरू होऊनही न सोडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कालव्यालगत शेती असलेले शेतकरी भातशेतीबरोबरच इतर भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. त्यामुळे कालव्याचे पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

भातसा उजवा कालवा (तीर) हा ५४ किलोमीटर लांबीचा आहे. या कालव्याचा शहापूर, भिवंडी तालुक्यातील जवळपास ५० गावांना लाभ होत असून त्यामुळे जवळपास एक हजार ६१३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

भातसा कालव्यालगतच्या गाव-पाड्यातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटणार आहे. भातसा कालव्यालगत सरळाबे, खरिवली, आवरे-कांबारे, चेरपोली, शहापूर, सावरोली आसनगाव, वासिंद, दहागाव येथील रहिवाशांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

भातसा कालव्याच्या पाण्यावर अनेक ग्रामपंचायती अवलंबून आहेत. नागरिकांना पिण्यासाठी, दुबार शेती करण्यासाठी पाणी सोडण्यात यावे.
पांडुरंग बरोरा, माजी आमदार
भातसा कालव्यातून शेतीसाठी येत्या दोन-चार दिवसांत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना पाण्याची सोय होणार आहे.
रवींद्र पवार, उपअभियंता, भातसा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT