Agriculture Irrigation : टेंभूतून रब्बी, उन्हाळी आवर्तने देण्यासाठी हवे ११ टीएमसी पाणी

Tembhu Irrigation Scheme : टेंभूच्या रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी ११ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे रब्बीचे आवर्तन कालवा समिती सल्लागार बैठकीत ठरल्याप्रमाणे शुक्रवारपासून (ता. १५) सुरू करण्याचे निर्देश होते, परंतु अद्याप आवर्तन सुरू करण्याच्या हालचाली झाल्या नाहीत.

मुळात, कोयना धरणातून पाणी सोडण्याचा वाद सुरू असल्याने आवर्तन वेळेत सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. टेंभूच्या रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी ११ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सांगलीत दोन महिन्यांपूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यामध्ये शुक्रवारपासून (ता. १५) टेंभूचे रब्बीसाठी आवर्तन सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : शेतीला पाणी कमी पडू देणार नाही

त्यामुळे हे आवर्तन शुक्रवारी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्यापूर्वी ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाले. सांगली पाटबंधारे विभाग कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी करत आहे. पण धरणातून पाणी सोडले जात नाही.

कोयना धरणातून पाणी सोडण्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. त्यामुळे ताकारी योजना सुरू असलेली बंद करावी लागली. त्यानंतर पंधरा दिवसांनंतर कोयनेतून पाणी सोडल्यानंतर पुन्हा ताकारी योजना सुरू करावी लागली.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : विसापूर-पुणदी सिंचन योजना सुरू

दरम्यान, टेंभू उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी अद्याप हालचाली सुरू झाल्या नसल्याचे चित्र आहे. टेंभू योजनेसाठी प्रत्येक महिन्याला दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. रब्बी आणि उन्हाळी या दोन्ही हंगामांतील आवर्तनासाठी सुमारे ११ टीएमसी पाण्याची आवश्कयता आहे.

मुळात कोयनेतून पाणी सोडण्यासाठी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आडकाठी होत असल्याने धरणातून पाणी सोडले जात नाही, असा आरोप सांगली जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. ही योजना सुरू होणार आहे.

रब्बीचे आवर्तन सुरू केले की उन्हाळी हंगामातील सर्वच आवर्तने सलग सुरू ठेवली जाणार आहेत. कोयना धरणातून पाणी सोडले तरच टेंभूचे आवर्तन सुरू होण्यास मदत होईल. टेंभूच्या दोन्ही आवर्तनसाठी सुमारे ११ टीएमसी पाणी हवे आहे. कोयना धरणातून पाणी वेळेत कृष्णा नदीत सोडणार का? आणि टेंभूचे आवर्तन वेळेत सुरू होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com