Pune Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Storage : पुणे जिल्ह्यातील बावीस धरणांतून पाण्याचा विसर्ग

Team Agrowon

Pune News : धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी धरणांतून पाण्याची आवक वेगाने सुरू असून, सुमारे २२ धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे मुठा, मुळा, पवना, आरळा, भीमा, भामा, इंद्रायणी, कानंदी, नीरा, कुकडी, मीना, घोड या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

पावसाचे जवळपास दोन महिने झाले आहे. या काळात जिल्ह्यातील मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एक जूनपासून ते ५ ऑगस्ट या कालावधीत मुळशी घाटमाथ्यावर सर्वाधिक पाच हजार १७७ मिलिमीटर पाऊस पडला.

तर लोणावळा घाटमाथ्यावर ३ हजार ७६४ मिलिमीटर, वळवण तीन हजार ३५६, ठोकरवाडी दोन हजार २८१, कुंडली दोन हजार ७९२, शिरोटा येथे दोन हजार ६७७ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे मुळशी, आंध्रा, वळवण, लोणावळा या धरणांत जवळपास ३९.७७ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. सध्या मुळशी धरणांतून २२ हजार ६८७ क्युसेकने सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस होत आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे भात खाचरे भरून वाहत असल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.

आत्तापर्यंत चार धरणे शंभर टक्के भरली असून, उर्वरित धरणांतही ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून काही धरणे लवकरच भरण्याची शक्यता आहे. जी धरणे भरली आहेत, अशा धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूर्व भागातील धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण क्षेत्रांतही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांत आत्तापर्यंत एकूण ४९.८७ एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. या सर्वच धरणांतील पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाला आहे.

त्यामुळे या धरणांतील पाणीसाठा ७० टक्क्यांहून अधिक झाला आहे. काही धरणे भरत आल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. कुकडी खोऱ्यातही पावसाचे प्रमाण काहीसे कमी असले तरी येडगाव, डिंभे, चिल्हेवाडी या धरणांतील पाणीसाठा ७० टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे मीना, कुकडी, आरळा, पवना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

सध्या भरलेल्या २२ धरणांतून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठची शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT