Farmer Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Protest : आवर्तन सोडण्यासाठी ‘रास्ता रोको’

Team Agrowon

Malegaon News : गिरणा धरणातून कळवाडी डाव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडावे, यासाठी राजश्री शाहू महाराज मालेगाव तालुका ऊसतोड कामगार संघटनेतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी समाधान खैरनार यांना निवेदन सादर केले. मालेगाव चाळीसगाव रस्त्यावरील उंबरदे फाट्यावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गोविंदा बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन झाले.

आंदोलनकर्त्यांनी ‘पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, घेतल्याशिवाय राहणार नाही, जय जवान, जय किसान’ आदी घोषणा दिल्या. बोराडे म्हणाले की, गिरणा धरणात सध्या ५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

जळगाव जिल्ह्याला पाणी सोडले जाते. मात्र, आमच्या परिसरात धरण असूनही पाणी सोडले जात नाही. देवघट, उंबरदे, चिंचगव्हाण, कळवाडी, दापुरे, साकुर, नरडाणे, मादुर्णे या आठ गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.विहिरींनी तळ गाठला आहे. कांदा व इतर पिके पाण्याअभावी संकटात आहेत.

जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा नाही. पाटाला पाणी सोडल्यास पिण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. आंदोलनामुळे येथे सुमारे दीड तास वाहतूकीची कोंडी झाली. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर देसले, देविदास यशोध, डॉ. पंढरीनाथ सरडाण, भरत शेलार, भरत वाघ, पंकज आहेर, बंडू पगार उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT