Water Crisis: वर्धा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. शहराला जीवनदायी ठरणाऱ्या धाम प्रकल्पातील पाणीसाठा सध्या केवळ ५४.६८ टक्क्यांवर आला आहे. उन्हाळ्याच्या उर्वरित कालावधीत वाढती मागणी, बाष्पीभवनाचा वेग आणि मर्यादित साठा यामुळे पुढील तीन महिन्यांत प्रशासनाची कसोटी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे..फेब्रुवारीपासून तापमानात वाढ होत असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. वर्धा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पात ५४.६८ टक्के पाणी शिल्लक असून, मागील वर्षी याच काळात हा साठा ६०.०४ टक्के होता. .Water Scarcity: सांगली जिल्ह्याचा टंचाई आराखडा ३४ कोटींचा.त्यामुळे यंदा साठ्यात घट झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणीही वाढत असल्याने उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे..Water Scarcity: घोड नदी कोरडी पडल्याने पाणीटंचाईची समस्या.दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प व पाईपलाईनची दुरुस्तीची कामे प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहेत. जलवाहिन्यांमधील गळती रोखणे, अनधिकृत नळजोडांवर कारवाई करणे आणि पाणीवाटपाचे नियोजन करणे यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. .आवश्यकतेनुसार काही भागांत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. उन्हाळा तीव्र होत असताना धरणांमधील पाणीसाठ्यातील घट चिंताजनक मानली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.