Pest Control : वाणगाव : सध्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचे वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील आंबा साधारणत: मेच्या अखेरीस विक्रीसाठी तयार होत असून याच कालावधीत वाढलेल्या तापमानाचा फटका आंबा उत्पादकांना बसत आहे.
आंब्याची फळे साधारणतः ६० ते ७० टक्के तयार झाली असून, या कालावधीत फळमाश्यांचा प्रादुर्भाव जाणवतो. फळमाश्यांना आकर्षित करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेला ‘रक्षक सापळा’ वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
फळमाश्यांच्या अनेक पिढ्या वर्षभरात होत असतात. या किडीचे नियंत्रण रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीद्वारे करणे अवघड आहे.
कारण किडीच्या अळ्या फळांच्या आत असतात आणि कोष जमिनीत असतात. फळमाशी नियंत्रणातील अडचणी लक्षात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेला ‘रक्षक सापळा’ वापरून फळमाश्यांचे नियंत्रण करणे सोपे जाणार असल्याची माहिती कृषी संशोधन केंद्र, पालघर येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. एल. के. गभाले यांनी दिली.
अांबावर्गीय पिकातील फळमाश्यांना आकर्षित करण्यासाठी
‘मिथाईल युजेनॉल’ तर वेलभाज्यावर्गीय लिकांच्या फळमाशीसाठी ‘क्यू-लूअर’ हे रासायनिक द्रव्य ठेवावे लागते. हे रसायन एका वेळेला साधारण दोन ते तीन मिली वापरावे लागते.
फळमाशीचा जीवनक्रम
फळमाशीच्या जीवनक्रमात अंडी, अळी, कोष आणि माशी या चार अवस्था असतात. अंडी अवस्था चार ते सहा दिवसांची, अळी अवस्था ११ ते १५ दिवसांची, तर कोष अवस्था ८ ते ११ दिवसांची असते. प्रौढ माशी चार ते पाच महिने जगते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या आठ ते १० पिढ्या पूर्ण होतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.