Rakesh Tikait Agrowon
ॲग्रो विशेष

Delhi Farmers' protest : लोकसभा निवडणुकीनंतर देशात होणार मोठे आंदोलन ; राकेश टिकैत यांची घोषणा

Rakesh Tikait : पंजाब आणि हरियानामध्ये एमसपी कायद्यावरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. यादरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारला इशारा देताना मोठे आंदोलन उभारणार असल्याचे म्हटले आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंजाब आणि हरियानामध्ये सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षातील उमेदवारांना शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. खासकरून भाजपच्या उमेदवारांना आपला विरोध राहिल असे शेतकरी नेत्यांनी याआधीच जाहीर केले होते. याप्रमाणे अनेक ठिकाणी भाजप उमेदवारांना विरोध झाला आहे. एकीकडे विरोध तीव्र होत असतानाच आता भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी लोकसभा निवडणुकीनंतर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी नेते मुकेश सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाराबंकी येथे टिकैत आले होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.

यावेळी टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधताना त्यांच्या 'मोदींच्या हमी'चा खरपूस समाचार घेतला. टिकैत म्हणाले, या देशात मोदी नावाची कोणतीही व्यक्ती नाही. तर हे फक्त एक टायटल झाले आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान करण्याऐवजी भाषा, प्रादेशिकता आणि जातिवादाच्या आधारावर शेतकऱ्यांना मतदान करण्यास भाजपने सांगितले आहे. पण सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांनी आंदोलनासोबत राहावे असे आवाहन देखील टिकैत यांनी केले आहे. 

टिकैत पुढे म्हणाले की, मुकेश वर्मा ही अशी व्यक्ती होती ज्यांनी मातीसाठी खूप ऐतिहासिक काम केले. सामुहिक विवाह कसे होतात याचा विक्रम त्यांनी राज्यात निर्माण केला. रक्तदान, शेतकरी, मजूर, दुकानदार, व्यापारी, राजकीय पक्षांसाठी त्यांनी नेहमीच साथ दिली. राज्यात त्यांनी आपल्या कामाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर देशातील शेतकरी एकजूट होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले. निवडणुकीनंतर आंदोलनाची पुढील रूपरेषा आणि  रणनीती सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी बोलून ठरवली जाईल. या आंदोलनाचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याने शेतकऱ्यांनी आंदोनाकडे लक्ष द्यावे नाही की कोणत्याही राजकीय पक्षांच्या बोलण्याकडे. 

४ जूननंतर काय ते ठरणार

सध्या आंदोलनासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल. ४ लोकसभेच्या निवडणुकींचे निकाल जाहीर होतील. यानंतर कोणाचे सरकार देशात येईल हे समोर येईल. यानंतरच रूपरेषा आणि रणनीती ठरवली जाईल. येणाऱ्या सरकारशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मागे हटू. पण तसे न झाल्यास देशात मोठे आंदोलन उभारले जाईल. जिथे देशातील सर्व शेतकरी एकत्र येतील असे टिकैत यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या आंदोलनावर लक्ष केंद्रित करताना कोणत्याही उमेदवाराबद्दल वाईट बोलू नका, आपले काम करा असे आवाहन टिकैत यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

राजकीय पक्षांचे जाहीरनामे

यूपीमध्ये मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. पण आता शेतकऱ्यांच्या शेतात वीज मीटर बसविण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात अनेक योजना आणि आश्वासनांची नोंद दिसते. पण कर्जमाफी तसेच एमएसपी हमी कायद्यासारख्या मोठ्या मुद्द्यांचा उल्लेख दिसत नाही अशी खंत टिकैत यांनी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांनी इच्छेनुसार मतदान करावे

शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या इच्छेनुसार कुठेही मतदान करावे. पण नोटाचा पर्याय वापरू नका. सरकार बळाच्या जोरावर आंदोलन दडपण्याचे काम करत आहे. पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यांवर दडपशाही करत आहे. यामुळे आता आपल्याला प्रत्येक गावातून ट्रॅक्टर चलाव आंदोलन करावे लागणार आहे. तसेच शेतकरी संघटनांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना सभासद करून संघटनेत घेतले पाहिजे, असे आवाहन देखील टिकैत यांनी केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT