Aslam Abdul Shanedivan
तीन कृषी कायद्यांविरोधात भारतीय किसान युनियनचे नेतृत्व करणाऱ्या राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारविरोधात राण उठविण्याचे ठरवले आहे
याबाबत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सोशल मीडिया साइट्स X वर याची घोषणा केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे संयुक्त किसान मोर्चाने १६ फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा केली आहे.
यावेळी टिकैत यांनी, १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली असून शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी शेतात काम करू नये. दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी भारत बंददरम्यान बेरोजगारी, अग्निवीर योजना, जुनी पेन्शन योजना असे अनेक प्रश्न भारत सरकारसमोर मांडले जाणार आहेत. तर एमएसपीची हमी कायद्याचा मुद्दा अग्रभागी असेल
आम्ही व्यापार्यांना (समर्थनासाठी) आवाहन करत आहोत आणि लोकांनीही त्या दिवशी कोणतीही खरेदी करू नये.
वाहतूकदारांनाही एक दिवस बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये इतर संस्थाही सहभागी होणार आहेत.