Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole : रेल रोको आंदोलन

Team Agrowon

Movement for Farmers : नाना पटोलेंनी शेतकऱ्यांचे आणि आदिवासींचे हक्क मिळवून देण्यासाठी अनेक संघर्ष केले. त्यांच्या नेतृत्वाखालील 'रेल रोको' आंदोलन हे त्यापैकी एक महत्त्वाचे आंदोलन ठरले. या आंदोलनाने नाना पटोले यांनी शेतकरी व आदिवासींना वन जमिनींचे पट्टे मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. हा लढा शेतकरी चळवळींमध्ये मोलाचा ठरला.

सरकार आणि वन विभागाच्या धोरणांमुळे शेतकरी आणि आदिवासींना बराच काळ त्यांच्या वन जमिनींचे पट्टे मिळत नव्हते. या जमिनी शेतकऱ्यांसाठी आणि आदिवासी समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. कारण या जमिनी त्यांच्या जीवनाचा, शेतीचा आणि उपजीविकेचा आधार होता. तथापि, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांना या जमिनींचा हक्क मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि आदिवासी समाजात तीव्र असंतोष पसरला होता.

नाना पटोले यांनी या समस्येवर आवाज उठवून सरकारकडून पट्टे मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु, सरकारच्या धोरणांमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे त्यांनी या अन्यायाविरूद्ध रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय धाडसी आणि अत्यंत प्रभावी होता. शेतकरी व आदिवासींच्या जमिनींच्या हक्कांसाठी त्यांनी नागपूर येथे ‘रेल रोको’ आंदोलन केले. या रेल रोको आंदोलनामुळे सरकारवर प्रचंड दबाव आला. पटोले यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने मोठ्या प्रमाणावर जनसहभाग मिळवला. मात्र, सरकारने याची गंभीर दखल घेत त्यांना अटक केली आणि नागपूर येथील सेंट्रल जेलमध्ये ठेवले. जेलमध्ये गेलेले नाना पटोले तिथेही शांत बसले नाहीत. त्यांनी जेलमध्ये उपोषण सुरू केले, कारण त्यांचा उद्देश केवळ आंदोलन करणे नव्हे, तर शेतकरी आणि आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून देणे हा होता.

नाना पटोले यांच्या या संघर्षाला प्रचंड लोकसमर्थन मिळाले. १४९ शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा देत जेल भरो आंदोलन केले. या आंदोलनाने शेतकरी आणि आदिवासी समाजात प्रचंड उत्साह निर्माण झाला. विशेषतः ज्या दिवशी हे जेल भरो आंदोलन झाले, तो दिवस बैल पोळ्याचा सण होता. हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच सेंट्रल जेलमध्ये सर्वांनी एकत्र येऊन बैल पोळ्याचा सण साजरा केला. हा सण साजरा करताना शेतकऱ्यांच्या जिद्दीची आणि एकतेची प्रतिमा दिसून आली. तसेच आंदोलनाला एक नवीन उर्जाही मिळाली.

या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने शेवटी नमते घेतले आणि शेतकरी व आदिवासींना वन जमिनींचे पट्टे मिळवून देण्यासाठी एक समिती तयार करण्याचे आश्वासन दिले. या वन समितीद्वारे प्रस्ताव मंजूर करून शेतकरी व आदिवासींना त्यांचे हक्काचे पट्टे मिळवून दिले जातील, असे सरकारने जाहीर केले. नाना पटोले यांच्या या संघर्षामुळे जवळपास ७०- ८० टक्के शेतकरी आणि आदिवासींना त्यांची जमिनी मिळवून देण्यात यश आले.

रेल रोको आंदोलनानंतर नाना पटोलेंना न्यायालयीन संघर्षही सहन करावा लागला. त्यांच्याविरूद्ध रेल रोकेची केस पुढे ७ ते ८ वर्षे चालली. परंतु नानांनी त्यांच्या संघर्षात कधीही माघार घेतली नाही. शेवटी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेतकरी आणि आदिवासींना मिळवून दिलेल्या यशाचे समाधान मिळाले.

नाना पटोले यांचे रेल रोको आंदोलन हे फक्त एक राजकीय आंदोलन नव्हते, तर ते शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीचा एक निर्णायक लढा होता. या आंदोलनाने शेतकरी आणि आदिवासींना त्यांची हक्काची वन जमीन परत मिळाली. नाना पटोले यांची जिद्द, त्यांचे नेतृत्व आणि त्यांच्या लढ्यामुळे शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या जीवनात मोठा बदल घडला. रेल रोको आंदोलन हे त्यांच्या संघर्षशील राजकीय वाटचालीचे एक सशक्त उदाहरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chitale Dairy : जातिवंत पशुपैदाशीचे तंत्रज्ञान पोहोचविणारी चितळे डेअरी

Fertilizer : निसर्ग क्रॉप केअरची युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित खते

State Agriculture Corporation Land : वित्त विभागाच्या विरोधाला केराची टोपली? शेती महामंडळाची ५.४८ हेक्टर जमीन शिर्डी संस्थानला मोफत

Onion Cultivation : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

BJP Candidate List : महायुतीच्या जागा वाटपाच्या रस्सीखेचात भाजपची बाजी; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT