Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बीची पेरणी सुरूच

Rabi Season : खानदेशात रब्बी पिकांची पेरणी सुरूच आहे. हरभऱ्याची सर्वाधिक एक लाख ७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी पिकांची पेरणी सुरूच आहे. हरभऱ्याची सर्वाधिक एक लाख ७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यापाठोपाठ तृणधान्य पिकांची पेरणी झाली आहे. मका, गहू पेरणी सुरूच आहे. यामुळे या पिकांच्या लागवडीबाबत स्पष्ट अंदाज अद्याप व्यक्त करता येत नसल्याची स्थिती आहे.

गव्हाची खानदेशात सुमारे नऊ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी सुरूच आहे. अनेक शेतकरी पावसामुळे शेताची पूर्वमशागत न झाल्याने पेरणी करू शकलेले नाहीत. यामुळे गहू पेरणी २० ते २२ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. सध्या पाऊस नाही. पण ढगाळ वातावरण आहे. अशात शेतकरी मशागत करून लागलीच यंत्राद्वारे पेरणी करून घेत आहेत.

मका लागवडदेखील सुरू आहे. खानदेशात मक्याची लागवडदेखील कमी दिसत आहे. ही लागवड सुमारे २५ हजार हेक्टरवर झाली आहे. लागवड सुरूच असून, ती सुमारे ३४ ते ३६ हजार हेक्टरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. पुढील आठवडाभरात मका लागवड पूर्ण होईल.

यानंतर फारशी लागवड होणार नाही. कारण मका साडेचार ते पाच महिन्यांचे पीक आहे. उष्णतेत मका पिकाचे सिंचन व इतर कार्यवाही करावी लागते. यामुळे अनेक शेतकरी १० ते १२ डिसेंबरनंतर मका लागवड करणे टाळतील, असेही चित्र आहे.

खानदेशात जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याची सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे ४५ हजार हेक्टरवर हरभरा पीक आहे. जळगव जिल्ह्यात हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी रावेर, यावल व चोपडा भागात झाली आहे.

यंदा कमाल शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन मका व गहू लागवड किंवा पेरणी कमी केली व काळ्या कसदार, मध्यम जमिनीत हरभऱ्याची पेरणी केली आहे. तसेच चोपडा व धुळ्यातील शिरपूर तालुक्यात काबुली किंवा डॉलर (मॅक्सीको) हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

पेरणी कमीच

खानदेशात यंदा रब्बीची पेरणी साडेतीन ते पावणेचार लाख हेक्टरपर्यंत होईल. मागील वर्षी चार लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. जळगाव जिल्ह्यातील पेरणी अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक होती. परंतु जळगाव जिल्ह्यातील पेरणी यंदा सुमारे दोन लाख हेक्टरपर्यंतच होईल, असे दिसत आहे. कारण पाऊसमान कमी असल्याने कृत्रीम जलस्रोत हवे तसे नाहीत.

तसेच कमी किंवा ५६ टक्के जलसाठा असल्याने गिरणा धरणातून रब्बीसाठी यंदा पाणी उपलब्ध झालेले नाही. गिरणा धरणाच्या मदतीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल भागातील २१ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना लाभ होतो. धुळे व नंदुरबारात फळ, भाजीपाला पिकांसह रब्बी पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’

Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT