Grape Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstrom Crop Damage : द्राक्ष, रब्बी पिकांना गारपिटीचा तडाखा

Crop Damage Due To Hailstorm : नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड आणि नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याला रविवारी (ता. २६) गारपिटीने तडाखा दिला असून द्राक्ष बागाांसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड आणि नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याला रविवारी (ता. २६) गारपिटीने तडाखा दिला असून द्राक्ष बागाांसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे जिल्ह्यांच्याही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. गारपीट आणि पावसामुळे भात, लागवड केलेला कांदा तसेच रब्बीमधील पिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी बहुतांश भागात ढगाळ हवामान होते. मात्र, दुपारनंतर पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली. पान ४ वर

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (ता. २५) सिन्नर तालुक्यातील काही गावांत पावसाने हजेरी लावली. तर सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २६) सकाळपासून पूर्ण ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. यामध्ये निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यांत गारपिटीने दाणादाण उडविली आहेत.

यामध्ये द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. यासह खरिपातील भात पीक पावसात भिजल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणी सापडल्याची स्थिती होती. अशातच शेतकऱ्यांनी कशीबशी पिके उभी केली. मात्र आता पिके अंतिम टप्प्यात काढण्यासाठी असताना आलेल्या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे.

द्राक्ष बागा फुलोरा व काही ठिकाणी मणीधारणा अवस्थेत असताना या गारपिटीमुळे बागांची मोठी हाणी झाली आहे. त्यामुळे संभाव्य उत्पादन हाती येणार नाही, मात्र बागाचे नुकसान अधिक आहे. चांदवड, निफाड तालुक्यांत पाण्याची टंचाई असतानाही उपलब्ध पाण्यावर खरीप पोळ लाल कांदा लागवडी केल्या होत्या.

हंगाम लांबणीवर गेला असताना काही ठिकाणी आता कांदा काढण्यासाठी होता. मात्र गारांच्या फटक्यात कांदा फुटून पडला आहे. देवळा, कळवण, चांदवड तालुक्यांत दाणादाण उडवली आहे. सटाणा तालुक्यात मध्यम पाऊस झाला.

निफाडमधील ३० हून अधिक गावांत नुकसान झाले. दरम्यान नाशिक जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे यांनी विमाधारकांनी ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

सटाणा तालुक्यात साल्हेर (भाटंबा) येथील सुरेश मुरलीधर ठाकरे (वय ३५) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना दुपारी तीन वाजता वीज पडून मृत्यू झाला आहे.

खानदेशात वादळी पाऊस

खानदेशात रविवारी (ता. २६) दुपारी नंदुरबार, धुळ्यातील काही भागात वादळी पाऊस झाला. पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात पूर्व भागात दुपारी ३ च्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर सुसाट वारे वाहू लागले. या वादळाचा वेग अधिक असल्याने झाडे उन्मळून पडली. काही भागात शेतातील विद्युत पुरवठा करणारे खांब कोसळून पडले. वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पावसाने झालेले नुकसान...

गारपिटीच्या फटक्यात द्राक्ष वेलींची पाने व काड्या तुटून पडल्या.

कांदा रोपवाटिकांत पाणी साचल्याने व गारपिटीमुळे रोपांची हानी.

सोंगलेली मका व भात पिके पावसात भिजल्याने पिकांची नासाडी.

जनावरांचा चारा पावसात भिजला.

अनेक ठिकाणी मळणी केलेला मका, सोयाबीन अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यात.

वाऱ्यासह गारपीट झाल्याने ऊस व चारापिके आडवे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT