Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठास वाढलेल्या विरोधानंतर सरकारकडून सावध भूमिका

Aslam Abdul Shanedivan

Pune News : नागपूर ते गोवा होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची आंदेलने सुरुच आहेत. नागपुरपासून गोव्यापर्यंत शेतकऱ्यांचा महामार्गास तीव्र विरोध आहे. तर या महामार्गावरून लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. यादरम्यान मंगळवारी (ता.१८) कोल्हापुरमध्ये काढण्यात आलेल्या मार्चानंतर आता सरकारला जाग आल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसे यांनी भुसंपादनावर बुधवारी (ता.१९) वक्तव्य केले आहे. भूसे यांनी, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही, असे म्हटले आहे. तर येत्या विधानसभेत या महामार्गाच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून सरकारकडून सावध भूमिका घेतली जात असल्याची सध्या राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

शक्तीपीठ महामार्गविरोधात राज्यातील शेतकरी जोरदार आंदोलन करत आहेत. नागपूर ते गोव्यापर्यंत शेतकरी महामार्गविरोधात एकवटला आहे. मंगळवारी कोल्हापुरात खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, राजूबाबा आवळे, ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांच्यासह प्रमुख नेते आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयावर विरोट मोर्चा काढला.

तसेच महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील, त्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे व पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली. तर १२ जुलैपर्यंत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच महामार्गासंदर्भातील त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन छेडणार असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भूसे यांनी या महामार्गाविषयी घोषणा केली आहे. भूसे यांनी, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सर्व शंकांच निरासन झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असेही स्पष्टीकरण भुसे यांनी दिले आहे. त्यामुळे लोकसभाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील फटका बसू नये याची खबरदारी सरकारकडून घेतली जात आहे.

यादरम्यान मंगळवारी कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी, शेतकऱ्यांच्या भावना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडू. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करून महामार्ग रद्द करण्यासाठीच आग्रह करण्याचे आश्वासन उपस्थित नेत्यांसह शेतकऱ्यांना दिले होते.

तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात होते. तेंव्हाच माझ्यासह माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, भाजपचे कार्यकर्त्यांनी महामार्ग रद्द करण्याची मागणी केली होती. तर सध्या ज्या भुसंपादनाच्या नोटिस काढल्या जात आहेत. त्या आत्ताच्या नसून आधी काढलेल्या आहेत असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी म्हटले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी राज्यात

Fruit Crop Insurance : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

SCROLL FOR NEXT