Post Mansoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Post Mansoon Rain : मराठवाड्यात मॉन्सूनोत्तर पावसाची हजेरी

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांतील २३१ मंडलांमध्ये मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कमी असला तरी हजेरी कायम आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांतील २३१ मंडलांमध्ये मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कमी असला तरी हजेरी कायम आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांत सोमवारी(ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. जवळपास १०७ मंडलांत अतिवृष्टी झाली होती.

सोमवारी सायंकाळनंतर पुन्हा लातूर व धाराशिव जिल्ह्यातील काही मंडलांमध्ये पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी सुरू आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ८३ मंडलांमध्ये पावसाची तुरळक, हलकी, मध्यम पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील १७ मंडलांत २० ते ४८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. तर, उर्वरित मंडलांत १.५ ते २० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडलांत तुरळक, हलका तर काही मंडळात मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्व मंडलांत झालेला पाऊस १ ते २५ मिलिमीटर दरम्यान नोंदला गेला. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडलांत १ ते ३५ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाल्याची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील ७ मंडलांत तुरळक हलका पाऊस झाला.

धाराशीव जिल्ह्यातील २९ मंडलांत पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील ९ मंडलांत २३ ते ३९ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. कळंब व धाराशिव तालुक्यातील काही मंडलांमध्ये पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसासह तूर, मका आदी रब्बी तसेच केळी, मोसंबी आदी फळपिकांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची यंत्रणेकडून वस्तुनिष्ठ पाहणी करून अहवाल देण्याचे काम सुरू आहे.

ऊसतोड कामगारांचे नुकसान

कायगाव जि. छत्रपती संभाजीनगर : कायगाव, अमळनेर (ता.गंगापूर) परिसरात रविवारी (ता.२६) व सोमवारी (ता.२७) झालेल्या विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. या भागात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कामगारांच्या राहत्या कोप्या, अन्नधान्य भिजल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे.

दिवसभर काबाडकष्ट करून आलेल्या कामकारांच्या वादळी वाऱ्यामुळे चुलीच पेटल्या नाहीत. त्यांच्या कोप्यातील अन्नधान्य, कपडे व इतर साहित्य भिजले. पावसामुळे त्यांना अख्खी रात्र जागून काढावी लागली. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२७) सकाळी फडातून पाचट आणून कोप्या दुरुस्त करून निवाऱ्याची पुन्हा सोय केली.

कायगाव भागात ऊसतोड बंद

रविवारी (ता.२६) रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतशिवार ओलेचिंब झाले होते. पावसाचे पाण्यामुळे उसाच्या फाडत पाणी साचले गेल्याने बैलगाडी निघण्यास हालअपेष्टा होतील, या भीतीने सोमवारी ( ता.२७) ऊसतोडणी बंद होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT