Papaya Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Farming : खानदेशात पपईची लागवड स्थिर; नंदूरबार आघाडीवर

Papaya Cultivation : उष्णतेचा फटका बसलेले पपई पीक पावसानंतर बऱ्यापैकी सुधारले आहे. पिकाची वाढ चांगली झाली आहे. आगाप लागवडीच्या पिकात फुलधारणा सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : उष्णतेचा फटका बसलेले पपई पीक पावसानंतर बऱ्यापैकी सुधारले आहे. पिकाची वाढ चांगली झाली आहे. आगाप लागवडीच्या पिकात फुलधारणा सुरू आहे. पपईची लागवड खानदेशात स्थिर आहे. नंदुरबार जिल्हा पपई लागवडीत आघाडीवर आहे. जिल्ह्यात मागील हंगामात सुमारे ५२०० हेक्टरवर पपई पीक होते.

नंदुरबारातील एकट्या शहादा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पपई पिकाची लागवड झाली होती. परंतु मागील हंगामात पपईला अल्प दर मिळाला. फक्त ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ च्या मध्यापर्यंत दर टिकून होते. सुरुवातीला पपई दर ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. जशी आवक वाढली तसे पपई दर कोसळले.

डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीत पपईला सरासरी तीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. मार्चमध्ये दुसऱ्या आठवड्यात पपईदरात सुधारणा झाली. परंतु मार्च महिन्यांपर्यंत अनेकांनी पीक काढून क्षेत्र रिकामे केले. कारण काढणी ठप्प होती. खरेदीदार पपई घेण्यास येत नव्हते. शेतातच किंवा झाडावर पपई पक्व होऊन खराब होण्याचा प्रकारही वाढला होता. शिवाय नंदुरबार, धुळे जिल्ह्यात रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपई पिकाची हानी झाली.

यामुळे पपई लागवड २०२४ मध्ये घटेल, असे संकेत होते. पपईची लागवड खानदेशात मार्च ते मे या कालावधीत केली जाते. परंतु अनेकांनी अधिक कालावधीच्या रोगप्रतिकारक्षम पपई वाणांची लागवड केली. ही लागवड जानेवारी व फेब्रुवारीत झाली. नंदुरबार जिल्ह्यात मात्र लागवड घटली आहे. जिल्ह्यातील लागवड २५ टक्के कमी झाली आहे. परंतु जळगाव जिल्ह्यातील लागवड ३० टक्क्यांनी वाढली आहे. जिल्ह्यात जळगाव, चोपडा, जामनेर व अन्य भागांत पपई पीक अधिक आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे १६५० हेक्टरवर पपई पीक आहे. धुळ्यातही सुमारे १२०० हेक्टरवर पपई पीक आहे. तर नंदुरबारातील लागवड साडेतीन हजार हेक्टरपर्यंत आहे.

आगाप पिकाला फटका

आगाप पिकाला यंदा अतिउष्णतेचा मोठा फटका बसला आहे. मेच्या अखेरीस व जूनच्या सुरुवातीला उष्णता अधिक होती. कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअस काही भागात होते. याचा फटका एप्रिल व मेमध्ये लागवड केलेल्या व आगाप पिकाला बसला आहे. काही शेतकऱ्यांचे पपई पीक काढून फेकावे लागले. पिकाचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर व अन्य उपाययोजना केल्या. त्यासाठी खर्चही अधिक लागला. परंतु उष्णतेमुळे उत्पादकतेला फटका बसणार असून, काही बागांचा काढणी हंगामही लांबणार आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT