Paddy Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : बळीराजावर अस्मानी संकट

Paddy Crop : अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. डहाणू, तलासरीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Team Agrowon

Wangaon News : यंदा संपूर्ण खरीप हंगाम पावसाच्या लपंडावामुळे वाया जाण्याच्या वाटेवर येऊन ठेपला आहे. तरीही एकंदरीत चांगला पाऊस झाल्याने उत्पादनही चांगले येण्याची अपेक्षा होती.

मात्र सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नंतर आता बुधवारी (ता. ९) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील भातशेती खाचरात आडवी केली आहे.

बुधवार सकाळपासून ढगाळ वातावरण हाेते, मात्र दुपारनंतर झालेल्या पावसाने मागील दिवसात वाळलेले भातपीक पुन्हा भिजले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. डहाणू, तलासरीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कापणीसाठी तयार होणारे भातपीक या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.

ॲग्रो विशेष

टोल-फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करावी

पालघरमध्ये चोलामंडल एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात आली. ज्यांनी भातपिकाचा विमा उतरविला आहे आणि सध्याच्या पावसाने कापणीपश्चात नुकसान झाले आहे, त्या तक्रारदारांच्या शेतात ३० नोव्हेंबरपर्यंत विमा कंपनीच्या प्रतिनिधींद्वारे सर्व्हे केला जाईल.

त्यानंतर भरपाई निश्चित केली जाईल. नुकसानग्रस्तांनी १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तक्रार दाखल करावी, असे विमा कंपनीमार्फत सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात

SCROLL FOR NEXT