Flood Damage Crop Kolhapur : कोल्हापुरात पूर नुकसानीचे १२२ कोटी रुपये जमा होण्यास सुरूवात

Cabinet Meetting : मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाईची १२२ कोटी रुपये रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे.
Kolhapur Flood Damage
Kolhapur Flood Damageagrowon
Published on
Updated on

Kolhapur Farmers News : कोल्हापूर जिल्ह्यात पूर नुकसानीचे १२२ कोटी जमा करण्यात आले आहेत. यातील २५ कोटी रुपये तहसीलदार यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे निवासी उपजिल्ह्याधिकारी संजय तेली यांनी दिली.

ते म्हणाले की, पूरनुकसानीचे १२२ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले आहेत. आत्तापर्यंत २५ कोटी रुपये वाटप केले आहे. उर्वरित रक्कमेचे तत्काळ वाटप केले जाणार आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ४७ हजार ८९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १ लाख ६२ हजार ८०० शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागले. याबाबत शासनाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले होते. यानंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाईची १२२ कोटी रुपये रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Kolhapur Flood Damage
Gokul Dudh Sangh Kolhapur : गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट; ११३ कोटी ६६ लाख रुपयांचा दूध फरक देणार

जिल्ह्यात ७ हजार ५०० हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. ४० हजार ३०० हेक्टर बागायती पिकांचे आणि ३७ हेक्टरवरील फळबागा पिकांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात १० हजार हेक्टर आणि हातकणंगले तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

करवीर ७ हजार ६८७, कागल २ हजार ४५३, राधानगरी १ हजार ४७८, गगनबावडा १ हजार २९७, पन्हाळा ५ हजार ९२४, शाहूवाडी ४ हजार ६७३, गडहिंग्लज ८०७, आजरा ३६१, चंदगड २ हजार ३०९, भुदरगड १ हजार ९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

लाखोंचे नुकसान तरी मदत नाही

जुलै महिन्यात झालेल्या पावसाने रूई (ता.हातकणंगले) गावाला पुराचा विळखा बसला. आमचे २ एकर ऊस पीक पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. तलाठी कार्यालयाकडून कागदपत्रे घेऊन आणि पंचनामा करून आता ३ महिने उलटल्यानंतर पैसे देण्यात येत आहेत. रान स्वच्छ करून आम्हाला दुसरे पीक घेण्यासाठी हातात पैसे नसल्याने आमची शेती तशीच पडण्याची वेळ आली. अद्याप पैसे जमा झाले नाहीत ज्यावेळी खात्यात येतील त्यावेळी आम्ही खरे समजू अशी प्रतिक्रिया ऊस उत्पादक शेतकरी प्रतिक धड्डे यांनी दिली.

तालुका नुकसानीची रक्कम (रुपयांमध्ये)

करवीर २२ कोटी १ लाख, कागल ६ कोटी २३ लाख, राधानगरी ४ कोटी ११ लाख, गगनबावडा ३ कोटी ४८ लाख, पन्हाळा १५ कोटी ८७ लाख, शाहूवाडी ११ कोटी ६३ लाख, हातकणंगले ११ कोटी ७९ लाख, इचलकरंजी ११ कोटी ५३ लाख, शिरोळ २५ कोटी ६७ लाख, गडहिंग्लज १ कोटी ७२ लाख, आजरा १ कोटी ३ लाख, चंदगड ४ कोटी ४१ लाख, भुदरगड २ कोटी ८८ लाख, एकूण १२२ कोटी ४२ लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील विभागात वर्ग करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com