Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : नांदेडमधील ‘विष्णुपुरी’त १८ टक्केच जलसाठा

Team Agrowon

Nanded News : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू झाली असून पारा ४३ अंशावर गेला होता. तसेच सध्या तीन ते चार दिवसांपासून पार ४२ अंशावर स्थिरावला आहे. त्यामुळे बाष्पी भवन वाढल्याने प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातही झपाटयाने घट झाल्याचे चित्र आहे. नांदेडकरांची तहाण भागविणाऱ्या गोदावरी नदीवरील काळेश्वर येथील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा आहे.

हा साठा पुढील दोन महिने (१५.१० दलघमी) पुरेल इतका आहे. असे असले तरी, चांगला पाऊस पडेपर्यंत पुढील काही द‍िवस पाण्याच्या बाबतीत कसोटी पाहणारे ठारणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. नांदेड जिल्ह्यात आठवडाभरापासून उष्णतेची लाट सुरू झाली आहे. सकाळपासूनच उन्हचे चटके तीव्र जाणवत आहेत. दिवसभरासोबतच रात्रीच्याही तापमान वाढत होत असल्याने असाह्य होत आहे.

तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनामुळे जलसाठयात घट होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, नांदेड पाटबंधारे विभागाच्या ३० मे च्या साप्ताहिक पाणी पातळी अहवालानुसार जिल्हयातील मध्यम व लघु १०४ प्रकल्पात १४५.१४ दलघमी उपयुक्त साठा असून त्याची टक्केवारी १९.९३ इतकी आहे. यात गोदावरी नदीवरील काळेश्वर येथील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात गेल्या आठवड्यात १७.६६ दलघमी पाणीसाठा होता. त्यात २.५६ दलघमी घट होऊन सध्या १५.१० दलघमी उपयुक्त साठा आहे.

त्याची १८.६९ इतकी टक्केवारी आहे. तसेच मानार प्रकल्पात मागील आठवड्यात ३२.९९ दलघमी इतका साठा होता. यात १.१५ दलघमीने घट होऊन ३१.८४ दलघमी साठा झाला असून त्याची टक्केवारी २३.४ इतकी आहे. मध्यम ९ प्रकल्पात मागील आठवड्यात २२.१४ दलघमी पाणीसाठा होता. त्यात १.६२ दलघमीने घट होऊन २०.५२ दलघमी पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी १४.७६ इतकी आहे. ९ उच्च पातळी बंधाऱ्यांत मागील आठवड्यात ५३.५० दलघमी पाणीसाठा होता.

त्यात ३.२८ दलघमीने घट होऊन ५०.२२ दलघमी पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी २६.४६ इतकी आहे. तसेच ८० लघु प्रकल्पात मागील आठवड्यात २९.९१ दलघमी पाणीसाठा होता. यात २.४५ दलघमीने घट होऊन २७.४६ दलघमी पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी १५.८९ इतकी आहे.

याशिवाय चार कोल्हापुरी बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट आहे. शेजारील हिंगोली जिल्ह्यातील ३१ प्रकल्पात २२२.०६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी २३.३८ झाली आहे. तर, परभणी जिल्ह्यातील ७ प्रकल्पात ७.६८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.

दोन ते तीन दिवसाआड सोडले जाते पाणी

नांदेड शहराची जवळपास साडे आठ लाख इतकी लोकसंख्या आहे. मनपाच्या शहरातील ३८ पाण्याच्या टाक्यांमधून सध्या दोन ते तीन दिवसाआड पाणी सोडले जाते. एक महिन्यासाठी ८ ते साडे आठ दलघमी इतके पाणी लागते. त्यामुळे पुढील दोन महिने पुरेल इतका उपयुक्त जलसाठा विष्णुपुरी प्रकल्पात आहे, असे मनपा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा (दलघमी) व टक्केवारी

विष्णुपुरी प्रकल्प १५.१० १८.६९ टक्के

येलदरी २१९.०० २७.०४ टक्के

सिद्धेश्वर ०० ०० टक्के

इसापूर ३०६.८३ ३१.८३ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT