Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : लघु, मध्यम प्रकल्पात उरले केवळ १५ टक्के उपयुक्त पाणी

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठत आहे. एकूण ८७७ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये मिळून केवळ २७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. त्यातही लघु मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट होत चालली असून या प्रकल्पांमध्ये १५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा बाकी आहे.

यंदा मराठवाड्यात पाणीटंचाई अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. आत्ताच अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अधिक गंभीर होण्याची चिन्ह आहेत.

सीनाकोळेगाव मृतसाठ्यात, माजलगाव मृत साठ्याकडे तर सीना कोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव प्रकल्पात केवळ एक टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

त्या पाठोपाठ निम्न तेरणा प्रकल्पात केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून निम्न दुधना व मांजरा प्रकल्पात प्रत्येकी १२ टक्के, जायकवाडीमध्ये २६ टक्के, विष्णुपुरीत २८ टक्के, निम्न मनारमध्ये ३५ टक्के , येलदरीत ४१ टक्के, उर्ध्व पेनगंगामध्ये ६१ टक्के तर सिद्धेश्वर प्रकल्पात सर्वाधिक ७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

धाराशिव, परभणी, जालन्यातील मध्यम प्रकल्प दयनीय अवस्थेत

मराठवाड्यातील ७५ माध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही परभणी, धाराशिव व जालना या तीन जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची पाणीसाठ्यांची स्थिती सर्वाधिक खालावली आहे.

परभणीमधील २ मध्यम प्रकल्पात केवळ ५ टक्के, धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पात ६ टक्के, जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पात ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाठोपाठ लातूर जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात ११ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्पात १२ टक्के, बीड मधील १६ मध्यम प्रकल्पात २४ टक्के तर नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पात ३६ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

जालना, परभणी येथील लघु प्रकल्प तळाकडे

मराठवाड्यातील ७५० लघु प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा केवळ १५ टक्के उरला आहे. त्यातही जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पात केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पात ८ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात ११ टक्के,बीडमधील १२६ प्रकल्पात १३ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ प्रकल्पात १६ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात १४ टक्के, हिंगोलीतील २७ प्रकल्पात ३० टक्के तर नांदेडमधील ८० लघु प्रकल्पात केवळ ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

८९ लघु व तीन मध्यम प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील ७५० लघु प्रकल्पांपैकी ८९ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये बीडमधील २५, धाराशिवमधील ४३ लातूर मधील ९ व छत्रपती संभाजीनगरमधील १२ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय ७५ मधून प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडे पडले आहेत.त्यामध्ये जालना, बीड व धाराशिवमधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT