Elections agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election : सोलापूर जिल्ह्यात दीड हजार मतदारांसाठी एक केंद्र

Election Update : लोकसंख्या वाढल्याने २०१९च्या निवडणुकीवेळी असलेल्या मतदान केंद्रांमध्ये यंदा वाढ झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : लोकसंख्या वाढल्याने २०१९च्या निवडणुकीवेळी असलेल्या मतदान केंद्रांमध्ये यंदा वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३५ लाख ७८ हजार ९७२ मतदार असून त्यांच्यासाठी यावर्षी तीन हजार ६०९ केंद्रे असणार आहेत.

एका केंद्रावर किमान ६०० ते दीड हजार मतदार मतदान करू शकतात, अशी व्यवस्था असते. दीड हजारापेक्षा अधिक मतदान होत असल्यामुळे आणखी १० मतदान केंद्रे वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या वाढल्याने गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील मतदान केंद्रात यंदा ४२ ने वाढ झाली आहे. गतवर्षी एकूण मतदान केंद्रांपैकी ३४ केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली होती. यंदा त्यात घट होणार असून निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे.

दुसरीकडे मतदारांसाठी आरोग्य, पाणी, महिला पोलिस ठाणे, ने-आण करण्यासाठी वाहने अशा सुविधा असणार आहेत. दरम्यान, आता ८० ते ८५ वर्षांपर्यंतच्या मतदारांना देखील मतदानासाठी केंद्रांवरच यावे लागणार आहे. केवळ ८५ वर्षांवरील मतदारांनाच घरबसल्या बॅलेट पेपरवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान करता येणार आहे.

सध्या निवडणूक ‘ईव्हीएम’वर नको बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी होत आहे. पण, निवडणुकीची तयारी यापूर्वीच पूर्ण झाल्याने आता ते शक्य नसल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. एकाच मतदारसंघात उमेदवारांची संख्या ४०० ते ५०० पर्यंत असल्यास वरिष्ठ स्तरावरून त्या मतदारसंघापुरता काहीतरी निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही सांगण्यात आले.

अशी असणार मतदान यंत्रणा

आचारसंहिता १५ मार्चपर्यंत लागू होईल, असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंदाज, एका मतदारसंघात साधारणत: ३८४ उमेदवार निवडणूक लढत असल्यास ‘ईव्हीएम’वरच होईल मतदान, बॅलेट पेपरवर मतदान होणार नाही, उमेदवार जास्त असल्यास मशिन (कंट्रोल युनिट) वाढविल्या जातील, एका मतदारसंघात जास्तीत जास्त ३८४ उमेदवार असल्यास ‘ईव्हीएम’वरच निवडणूक, पण अधिक उमेद वार असल्यास वरिष्ठ स्तरावर निर्णय.

शाळांना उरकावी लागणार १५ एप्रिलपूर्वीच परीक्षा

आचारसंहिता जाहीर झाल्यावर निवडणुकीच्या तारखा देखील स्पष्ट होतील. एप्रिलमध्ये मतदान असल्यास त्यापूर्वी शाळांना विद्यार्थ्यांची अंतर्गत परीक्षा घ्यावी लागणार आहे. तत्पूर्वी, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडेल.

मतदानावेळी दोन-तीन दिवस शिक्षकांनाही ड्यूटी असणार आहे. त्यामुळे शाळांना १० एप्रिलपूर्वीच परीक्षा घ्यावी लागण्याची शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. तर निवडणूक जाहीर झाल्यावर त्या तारखा पाहून शाळा स्तरावर निर्णय होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT