Court Notice to Yashwant Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Yashwant Sugar Factory Notice: ‘यशवंत’च्या ३०० कोटींच्या जमीन विक्रीप्रकरणी नोटीस

Court Notice on Rs 300 Crore Land: यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या शंभर एकर जमिनीच्या विक्रीविरोधात शेतकरी सभासदांनी याचिका दाखल केली आहे. या विक्रीचे प्रमाण ३०० कोटी रुपये असून, न्यायालयाने संबंधितांना नोटीस पाठविल्या आहेत आणि २० जूनला महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

Team Agrowon

Pune News: यशवंत सहकारी साखर कारखान्याची शंभर एकर जमीन सुमारे ३०० कोटी रुपयांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयाविरोधात शेतकरी सभासद कृती समितीच्या वतीने विकास लवांडे, लोकेश कानकाटे, सागर गोटे, राजेंद्र चौधरी या सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेत संबंधितांना नोटिसा पाठविल्या असून, २० जूनला महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, शासन निर्णयानुसार १ रुपयांत शासकीय जमीन बाजार समित्यांना मिळत असताना, मुदतठेवी मोडून आणि कर्ज काढून ३०० कोटी रुपयांना जमीन खरेदी बाबतचे वृत्त ‘दै. ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केले होते. यानंतर सभासदांनी दाखल केलेल्या याचिकेची पहिली सुनावणी न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर व न्यायमूर्ती मिलिंद साठे या खंडपीठापुढे झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ‘एफआरपी’ याचिकेतील ॲड. योगेश पांडे यांनी बाजू मांडली. पहिल्या सुनावणीत, शेतकऱ्यांनी यापूर्वी दाखल व निकाली झालेल्या याचिकेतील अंतरिम आदेश व निकाल निदर्शनास आणून दिला.

यशवंत कारखाना हा वर्ष २०१२-१३ पासून आजतागायत बंद आहे. २०१७ मध्ये कारखाना अवसायानात काढण्यात आला. पुढे २०२२ मध्ये अवसायन रद्द होत २०२४ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक झाली. या सर्व कालावधीत कारखान्याचे नेमके किती देणे-येणे आहेत, याबद्दल कोणताही ठोस स्वरूपाचा अहवाल उपलब्ध नाही. मुळात कारखान्याला राज्य सहकारी बँकेला किती रक्कम देणे बाकी आहे यातही तफावत आहे. तसेच कारखान्याची संपूर्ण मालमत्ता राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात होती.

कारखान्याची मोठ्या प्रमाणात मशिनरी गायब झाल्याने तब्बल ५० कोटी रुपयांचे सभासद शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. पांडे यांनी निदर्शनास आणले. तसेच, संस्थेच्या पूर्वीच्या संचालक मंडळांनी केलेल्या आर्थिक अपहारप्रकरणी वर्ष २०१३-१४ पासून संचालकांकडून तब्बल १४ कोटी रुपये व त्यावरील व्याज येणे आहे. त्याबाबत वसुलीसाठी प्रादेशिक साखर संचालकांचे आदेश झाले होते; मात्र रक्कम वसुलीसाठी आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.

मागील रक्कम, येणे बाकी रक्कम तसेच साखर विक्रीतून वर्ष २०११-१२ मध्ये प्राप्त झालेले वीस कोटी रुपये राज्य बँकेत जमा करण्यात आले आहेत. याचाही हिशेब जुळत नसल्याने ‘यशवंत’ ला काहीच देणे लागत नाही, असेही न्यायालयास निदर्शनास आणून देण्यात आले. सर्व बाबींचा विचार करता न्यायालयाने याबाबत संबंधित सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करत या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जून रोजी नियोजित निर्धारित केली आहे. सरकारतर्फे ॲड. वाळिंबे व इतर प्रतिवादी यांच्या वतीने ॲड. अभिजित कदम, ॲड. प्रसाद आव्हाड यांनी बाजू मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT