Onion Agrowon
ॲग्रो विशेष

NCCF Onion Purchase : ‘एनसीसीएफ’ कांदा खरेदी, विक्रीसंबंधी गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न

Central Government : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून एक हजार कोटींचा कांदा खरेदी करण्याचे सांगण्यात आले. एकीकडे गुणवत्तेचा कांदा खरेदी केला असताना निकृष्ट कांदा विक्री केंद्रावर ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याचे दिल्लीत समोर आले.

मुकुंद पिंगळे

Nashik News : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून एक हजार कोटींचा कांदा खरेदी करण्याचे सांगण्यात आले. एकीकडे गुणवत्तेचा कांदा खरेदी केला असताना निकृष्ट कांदा विक्री केंद्रावर ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याचे दिल्लीत समोर आले. मात्र असे असतानाही ‘एनसीसीएफ’चे अध्यक्ष यांचे सातत्याने दुर्लक्ष, तर अधिकाऱ्यांकडूनही माहिती देण्यास टाळाटाळ यामुळे हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारने रब्बी उन्हाळ कांदा खरेदी करताना गुणवत्ता, प्रतवारी असे निकष लावले. तर कांद्याचा दर्जा टिकविण्यासाठी कांद्याच्या शास्त्रोक्त साठवणुकीसाठी उपाययोजना करण्यात आल्याचे वारंवार सांगण्यात आले. मात्र असे असताना अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी स्वतः धाडी टाकून गैरव्यवहारांची पोलखोल केली. याउलट ‘एनसीसीएफ’चे अध्यक्ष विशाल सिंग यांनी वारंवार दुर्लक्ष केल्याने संशयाचे ढग अजूनच गडद झाले आहेत.

यापूर्वी मे महिन्यात अध्यक्ष विशाल सिंग हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी एका हॉटेलमध्ये ठरावीक घटकांशी चर्चा करून खरेदीचे कामकाज दिल्याची चर्चा रंगली होती. नंतर ठरावीक महासंघांना सोबत घेऊन पिंपळगाव बसवंत येथे बैठकही घेतली. त्या वेळी पैसे घेऊन खरेदी दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता नाशिक दौऱ्यावर ‘एनसीसीएफ’चे सरव्यवस्थापक शौकत अली आले आहेत.

‘एनसीसीएफ’ने खरेदी केलेला कांदा दिल्लीत किती पाठवला, असे विचारले असता माहिती दिल्ली कार्यालयाकडे असते असे सांगून बोलण्याचे टाळले. मात्र ‘दिल्लीत कांदा विक्रीत गैरव्यवहार होत आहे’, यावर त्यांनी ‘दिल्लीत कांदाच पाठवला नाही’ अशी धक्कादायक माहिती दिली. तर ‘दिल्लीत शीतगृहात कांदा साठवला आहे, त्यामुळे कोंब येण्याचा प्रश्‍नच नाही,’ असे सांगत सारवासारव केली. मात्र ‘दिल्लीत निकृष्ट, कोंब फुटलेला कांदा कसा विकला जातोय’ असे विचारताच बोलणे टाळले, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय बळावला आहे.

गेल्या दोन वर्षांत राजकीय नेते व कांदा व्यापाऱ्यांचा या खरेदीत हस्तक्षेप वाढला. त्यात दिल्ली, उत्तर प्रदेश व बिहार राज्यांतील काही भांडवलदारांची भर पडली. जिल्ह्यातील ठरावीक राजकीय नेते, व्यापाऱ्यांनी भांडवलशाहीचा वापर करून एकीकडे ‘एनसीसीएफ’ व दुसरीकडे ‘नाफेड’ अशा दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या महासंघांच्या माध्यमातून खरेदी केली. त्यात मोठा गोंधळ आहे. आता कांद्याची रिकव्हरी देण्याची वेळ आली असता गुणवत्ता तर नाहीच; मात्र खराब कांदा पाठवण्यात आला. तर कांदा शिल्लक नसल्याने काही महासंघ खरीप लाल कांदाही पाठवत असल्याचे समोर आले आहे.

दहा महांसघांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली

कांदा खरेदीमध्ये मलिदा लाटण्यासाठी राजकीय पदाधिकारी, भांडवलदार व्यापाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर संगनमत करून मोठे गौडबंगाल केले. खरेदीचे निकष डावलले, तर कुठे कागदावर खरेदी झाली, कुणी खरेदी करून तो विकून टाकला. तर कुणी निकृष्ट कांदा रिकव्हरीच्या नावाखाली पाठविला.

आता सर्व प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर ‘एनसीसीएफ’ सरव्यवस्थापक जिल्हा दौऱ्यावर आले. खुद्द त्यांनीच रिकव्हरी न देणाऱ्या काही महासंघांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केल्याचे ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले. मात्र यात तोट्यात असलेल्या शेतकऱ्यांच्या संबंधित महासंघाचा बळी दिला जाणार की खरोखर मलिदा लाटणाऱ्या बोगस काम करणाऱ्या नेत्यांच्या व व्यापाऱ्यांच्या महसंघांवर कारवाई होणार, हे पाहणे अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT