Kolhapur News: जमीन हक्कासाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचा संयुक्त मंच असलेल्या ‘भूमी अधिकार आंदोलन’ची बैठक दिल्लीत झाली. त्यामध्ये बुधवारी (ता. १३) देशभरात भूमी हक्क आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती किसान सभेचे राज्य सचिव गिरीश फोंडे यांनी दिली.
श्री. फोंडे म्हणाले, ‘‘देशात शेतकरी व जनविरोधी अमेरिकी व्यापार नीती राबवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यात केंद्र सरकारला शेती उत्पादने, डेअरी प्रॉडक्टमध्ये शेतकरीहितांचे रक्षण करण्यात अपयश आले आहे. किमान हमीभावाचा कायदा संसदेत मंजूर केला गेलेला नाही.
याउलट देशातील उद्योगपतींकडून प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. दहा वर्षे जुने ट्रॅक्टर हे स्क्रॅप केले जाणार आहेत. विजेचे खासगीकरण होणार आहे. जनसुरक्षा कायदा आंदोलने दडपण्यासाठी आणला आहे. उद्योगपतींचे १० लाखांहून अधिकचे कर्जमाफ केले आहे; पण शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही.’’
या वेळी ‘शेकाप’चे बाबूराव कदम, अमोल नाईक, अजित पवार, सागर कोंडेकर, बाबासाहेब देवकर, डॉ. सुभाष जाधव, नामदेव पाटील, हरीश कांबळे, वाय. एन. पाटील, कुमार जाधव उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.