Rakesh Tikait Agrowon
ॲग्रो विशेष

Madhya Pradesh Soybean Farmers' Protest : मध्य प्रदेशात १ ऑक्टोबरला चक्का जाम आंदोलन; टिकैत यांचा सहभागी न होण्याचा निर्णय

Rakesh Tikait On Soybean Farmers' Protest : मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा भाव ६ हजार रुपयांपर्यंत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यासाठी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात सोयाबीनचा भाव ६ हजार रुपयांपर्यंत करावा, अशी मागणी मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांची केली आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केली आहेत. तर आता भारतीय किसान युनियन आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM) यांच्या नेतृत्वात १ ऑक्टोबर रोजी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. याआधी भारतीय किसान युनियन (BKU) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी चक्का जाम आंदोलन सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनच्या कमी दरावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोयाबीनचा भाव ६ हजार रुपयांपर्यंत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच मागणीसाठी भारतीय किसान युनियन आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM)च्या नेतृत्वात ३० शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात रास्ता रोको करण्याची घोषणा संघटनाकडून करण्यात आली आहे. मात्र या आंदोलनात आता फूट पडल्याचे समोर आले आहे. बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी या आंदोलनातून आपले अंग काढले आहे. तर या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि त्याच्या घटक संघटना सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

यावेळी टिकैत यांनी आंदोलनात सहभागी न होण्याचे कारण देखील सांगितले आहे. टिकैत म्हणाले, सोयाबीनच्या कमी भावाविरोधात विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनाचे राजकारण केले जात आहे. पण आम्ही काही राजकारणी नाही. तर जे काही राजकारणी या आंदोलनाचा भाग झाले आहेत, त्यांनी स्वतंत्रपणे आपली चळवळ चालवावी. राजकारण करणाऱ्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता, असेही टिकैत यांनी म्हटले आहे.

राज्यातील शेतकरी सोयाबीनच्या दरावरून आंदोलन करत आहेत. हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. त्याला कोणी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. सोयाबीनच्या प्रश्नावर आम्ही सतत शेतकऱ्यांचा आवाज उठवत आहोत. सध्या देखील सोयाबीनचे भाव खूपच कमी असून सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी टिकैत यांनी केंद्रासह राज्य सरकारकडे केली आहे.

टिकैत यांच्या वक्तव्यावरून आता प्रतिक्रिया उमटत असून संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य राम इनानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इनानिया यांनी म्हटले की, १ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी चक्का जाम केला जाणार आहे. ज्यात ३० शेतकरी संघटनांचा समावेश आहे. पण आता टिकैत यांचे वक्तव्य समोर आले आहे. तर त्यांच्या या वक्तव्याचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही. या आंदोलनाशी त्यांचा काही संबंध नाही. बाहेरचे लोक येथे येऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचेही इनानिया यांनी सांगितले आहे.

तसेच १ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाचा राज्यातील वाहतूकीवर कोणताही होणार नाही. तर हा चक्का जाम फक्त प्रतिकात्मक असून जो तीन तासांचा असेल. यासोबतच २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत गावोगावी मशाल मिरवणूकही काढण्यात येणार आहे.

मध्य प्रदेशात यंदा सोयाबीनचे भाव घसरले होते. येथे सोयाबीनला प्रति क्विंटल ३,५०० ते ४,००० पर्यंत भाव मिळाले. सध्या भावात काही सुधारणा झाली आहे. भाव ४००० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. जे सोयाबीनच्या किमान आधारभूत किंमतीच्याही खाली आहेत. केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२४-२५ साठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (MSP) ४८९२ रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. पण शेतकऱ्यांकडून सोयाबीनला ६००० रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अशी मागणी होत आहे. पण या मागणीकडे सरकारने अद्याप लक्ष दिलेले नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्यभर त्यांच्याकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT