Omraje Nimbalkar Agrowon
ॲग्रो विशेष

Omraje Nimbalkar News : खा. निंबाळकर आणि आ. पाटील यांचं महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन!

Dhananjay Sanap

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात विजेच्या लपंडावानं शेतकरी वैतागलेत. दुष्काळामुळं जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहीरी आणि बोअरवेल्स उपशावर आलेत. एकदा उपसा केल्यानंतर पुन्हा पाणी येण्यासाठी दिवसभर वाट पाहावी लागते.

त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी वेळेवर वीजपुरवठा करण्यात येत नसल्याची तक्रार शेतकरी करतात. पण महावितरणकडे तक्रार केली तरी दखल घेतली जात नाही. त्यामुळे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी (ता.३१) महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.

"महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांशी उद्धटसारखं बोलतात. त्यामुळं शेतकऱ्यांचे आम्हाला सतत फोन येतात. महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवणार नाहीत, तोवर आम्ही इथेच बसून राहू," अशी भूमिका निंबाळकर यांनी घेतली होती. तसेच कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं.

यावेळी महावितरणचे कर्मचारी कार्यालयीन वेळ पाळत नाहीत, असंही चित्र पाहायला मिळालं. राज्यात वीज प्रश्न कायम चर्चेत असतो. भारनियमनामुळे शेतकरी जेरीस आलेत. त्यात दुष्काळाचा तडाखा शेतकऱ्यांना बसतोय.

खासदार निंबाळकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. ते म्हणाले, "आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांचे फोन उचला, अशा सूचना करण्यास सांगितलं होतं. पण तरीही आचारसंहितेत कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे फोन घेतले नाहीत." असंही निंबाळकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT