Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : माॅन्सूनच्या मुहूर्तावर पेरणीला सुरुवात

Kharif Season 2025 : मागील अनेक दिवसांपासून आगमनाची चाहूल देत असलेला माॅन्सून अखेर प्रकटला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील बळीराजा अखेर सुखावला आहे.

Team Agrowon

Palghar News : मागील अनेक दिवसांपासून आगमनाची चाहूल देत असलेला माॅन्सून अखेर प्रकटला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील बळीराजा अखेर सुखावला आहे.

गतवर्षी होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांनी यंदा चांगला पाऊस होईल, या आशेने जगाचा पोशिंदा उन्हाच्या झळा सोसत काही दिवसांपासून पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यास व्यग्र होता. आता पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली आहेत.

पावसाचे आगमन होताच जिल्ह्यातील शेतकरी भात पेरणीच्या तयारीला लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी माॅन्सूनच्या मुहूर्तावरच पेरणीचा मुहूर्त साधला आहे.

पालघर जिल्ह्यात गुरुवारी (ता. १९) काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

१९ ते २६ जूनदरम्यान पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी भात रोपवाटिकेच्या पेरणीला सुरुवात करू शकतात. आता पावसाचे सातत्य राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात करावी, असे कृषी शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT