Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar: मराठवाडा तहानलेला राहणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

Marathwada Water Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची योजना हाती घेतल्याचे सांगितले. तसेच, राज्यातील महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक संभ्रम पसरवत असले तरी गरिबांसाठीच्या सर्व योजना सुरूच राहतील, असा विश्वासही त्यांनी दिला.

Team Agrowon

Nanded News: मराठवाड्याला पाण्याची कमतरता भासणार नाही, यासाठी आपले प्रयत्न असतील. नाशिक भागात पश्‍चिमेकडे पडणारे पावसाचे पाणी वाहून समुद्राला जाते, ते वळवून पूर्वेकडे महाराष्ट्रात आणले जाईल. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची योजना प्रगतिपथावर आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या पक्षाच्या विस्ताराच्या निमित्ताने अजित पवार प्रथमच नांदेडमध्ये आले होते. नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर विमानतळ ते गुरुद्वारापर्यंत त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. सहा वेगवेगळ्या ठिकाणी क्रेनच्या माध्यमातून त्यांना अतिभव्य पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर ओम गार्डन मंगल कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अजित पवार म्हणाले, की पुण्यात स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीला शिताफीने पकडण्यात आले आहे. त्याला योग्य ती शिक्षा होईलच; परंतु त्याच्यात ही विकृती आली कशी, याचा विचार केला पाहिजे. शिवराय, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात महिला-भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कर्तव्य बजावावे, अशा रोखठोक शब्दांत अजित पवार यांनी भूमिका मांडली.

अजित पवार यांनी पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांसह प्रसिद्धी माध्यमांनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. आपल्या बातम्यांमुळे आरोपी पकडण्यास मदत व्हावी, आरोपीला पळून जाण्याची संधी मिळू नये, असे वार्तांकन करण्याचा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला. तर नेते, कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, की महाराष्ट्र हा नेहमीच सुसंस्कृत राहिला आहे.

विरोधकांना देखील सन्मानाने वागवण्याची आपली परंपरा आहे. कालच मराठी भाषा दिन साजरा झाला. प्रत्येक मराठी माणूस विचाराने कोणीही असला तरी तो महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करणार, याची खूणगाठ प्रत्येकाने कायम मनाशी बांधली पाहिजे.

विरोधकांकडून संभ्रमाचे वातावरण निर्मिती

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की विधिमंडळाचे अधिवेशन तीन मार्च रोजी सुरू होत आहे. यात १० रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. विरोधक लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. परंतु लाडक्या बहिणींसह सर्व समाजघटकांना मी आश्‍वस्त करतो की, गरिबांच्या हिताच्या कोणत्याही योजना बंद पडणार नाहीत, असे निःसंदिग्धपणे सांगून पवार म्हणाले की, जे लोक आपल्या उत्पन्नातून कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नाहीत, त्यांच्या मदतीसाठी सरकारचे प्रयोजन असते आणि सरकार आपले कर्तव्य चोखपणे बजावेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT