Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा १८ टक्क्यांवर

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : अपुऱ्या पावसामुळे आधीच कमी भरलेले प्रकल्प आता झपाट्याने दम तोडू लागले आहेत. मराठवाड्यातील एकूण ८७७ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा १८ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे १२० लघु मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून ३१७ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

आजच्या घडीला मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात २३ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पात केवळ ९ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात १० टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २१ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यात १० टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

माजलगाव, सीनाकोळेगाव मृतसाठ्यात

मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी माजलगाव व सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठा मृतसाठ्यात आधीच गेला आहे. दुसरीकडे निम्न तेरणा प्रकल्प मृतसाठ्याच्या उंबरठ्यावर आहे. या प्रकल्पात केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा व निम्न दुधना प्रकल्पात प्रत्येकी सरासरी ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून जायकवाडी या सर्वात मोठ्या प्रकल्पात केवळ १६ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. येलदरीमध्ये ३४ टक्के, सिद्धेश्वरमध्ये ३९ टक्के, उर्ध्व पैनगंगामध्ये ४६ टक्के, निम्न मनारमध्ये २९ टक्के तर विष्णुपुरीत ४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जालन्यातील ५७ लघु प्रकल्प मृतसाठ्यात

मध्यम प्रकल्पाप्रमाणेच मराठवाड्यातील सर्वाधिक संख्येने असलेल्या लघु प्रकल्पांची स्थितीही दयनीयच आहे. जालन्यातील ५७ लघु प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. याशिवाय परभणीतील २२ लघु प्रकल्पात केवळ ६ टक्के,धाराशिवमधील २०६ प्रकल्पात ८ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात ८ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात १० टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ प्रकल्पात ११ टक्के, हिंगोलीतील २७ प्रकल्पात १३ टक्के तर नांदेडमधील ८० लघु प्रकल्पात २९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. लघु प्रकल्पातही गत तीन वर्षात सर्वात नीचांकी पाणीसाठा आजच्या घडीला असल्याची स्थिती आहे.

पाच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प दयनीय अवस्थेत

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचे अवस्था अत्यंत दयनीय आहे. परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पात केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पात ३ टक्के, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पात ७ टक्के, छत्रपती संभाजीनगर मधील १६ प्रकल्पात ७ टक्के तर जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पात ५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. बीडमधील १६ मध्यम प्रकल्पात १६ टक्के तर नांदेड मधील ९ मध्यम प्रकल्पात २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गत तीन वर्षातील आजच्या घडीला असलेला मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जवळपास चार ते पाच पट कमी आहे.

जिल्हानिहाय कोरड्या पडलेल्या लघु-मध्यम प्रकल्पांची संख्या

जिल्हा लघु प्रकल्प मध्यम प्रकल्प

छ.संभाजीनगर १२ ००

जालना ०० ०१

बीड ४३ ०२

लातूर ११ ००

धाराशिव ५५ ०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT