Water Stock : नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत अत्यल्प साठा

Water Scarcity : नंदुरबार जिल्ह्यात पाच मध्यम व १२ लघू सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत एकूण ४६ टक्के साठा आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात पाच मध्यम व १२ लघू सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत एकूण ४६ टक्के साठा आहे. त्यात मध्यम प्रकल्पात ६०, तर लघूसिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २३ टक्के साठा आहे. त्यांपैकी चार प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई अटळ असल्याचे चित्र आहे.

या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. झाला तोही अवेळी झाला. त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना खरिपाच्या पिकांना बसला होता, तर रब्बी पिकांच्या वेळी बेमोसमी पावसाने तोंडातला घास हिरावून नेला होता.

Water Stock
Water Stock : खामगावात मन प्रकल्पाच्या पाणी साठ्यात दररोज घट

अशा स्थितीत पाऊस कमी झाल्याने यंदा सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेच नाहीत. त्यामुळे यंदा शेती सिंचनासाठी तर सोडा माणसांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळविण्याकरिता भटकंतीची वेळ येऊ घातली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जरी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला असला तरी तो तीन टप्प्यांत आहे.

त्यातही तो संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडा आहे. त्यांपैकी ऑक्टोबर ते डिसेंबर व जानेवारी ते मार्च असे दोन तिमाही टप्पे निघून गेले आहेत. आता तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र त्यात प्रशासकीय आकडेवारीनुसार धडगाव तालुक्यात एकाच पाड्यावर टॅंकरने पाणीपुरवठा होत असल्याची नोंद आहे.

Water Stock
Dam Water Stock : पालघरमधील धरणांमध्ये ५० टक्क्यांहून कमी साठा

तर इतर तालुक्यांत विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. असे असले तरी नंदुरबार तालुक्यात आजच पूर्व भागातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्‌भवली आहे. आजमितीस जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्याचा विचार केल्यास अत्यल्प आहे. जिल्ह्यात पाच मध्यम व १२ लघू प्रकल्प आहेत.

त्यात वीरचक धरण नंदुरबार शहरासाठी जीवनामृत ठरले आहे. तेथूनच शहराला पाणीपुरवठा केला जातो. जोरदार पाऊस झाल्यास या धरणांतील साठा वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ होतो. मात्र मागील वर्षीही कमी पाऊस झाला. या वर्षीही पाऊस कमी, त्यामुळे धरणातील जलसाठा आजअखेर केवळ २८ टक्क्यांवर आला आहे. त्यात आंबेबारा धरणातून पाणी आणून टाकले जात असल्याने त्यात भर पडली आहे. यंदा पाऊस लांबल्यास शेवटच्या टप्प्यात शहरातही पाणीबाणीचे संकट अटळ आहे.

जिल्ह्यातील चार प्रकल्प कोरडे

दरम्यान, १२ लघू प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडेठक पडले आहेत. त्यात अमरावती नाला, चौपाळे, घोटाणे व सुसरी प्रकल्पांचा समावेश आहे.

प्रकल्पातील जलसाठा (टक्केवारी) असा

मध्यम प्रकल्प : शिवण २८.८६, दरा ९४ , नागन ७८.११, कोरडी ४७.४३, दहेली ५४, एकूण ६०.१६ टक्के

लघू प्रकल्प : मेंदीपाडा २२.२९, देवळीपाडा ४५.९०, ढोंग ९.३९, रंकानाला ९८.५८, अमरावती ००, चौपाळे ००, घोटाणे ००, सुसरी ००, नेसू २७.५८, चिरडा १५.१८, धनपूर १९, भुरीवेल ७३ असा एकूण २३.१५ टक्के जलसाठा आहे. मध्यम व लघू प्रकल्प मिळून एकूण ४६.७८ टक्के जलसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com