Maharashtra Politics News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गुरुवारी (ता.०२) राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात पहिली बैठक झाली. अवघ्या ३० मिनीटात ही बैठकीमध्ये केवळ ३ निर्णय घेण्यात आले. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य खात्याचे मंत्री उपस्थित होते. तसेच संबंधित खात्याचे मंत्रालयीन अधिकारीही उपस्थित होते.
यावेळी मंत्रालयात एफआरएस तंत्रज्ञान बसविण्यासंदर्भात चर्चा झाली. सहाव्या मजल्यावर अभ्यंगत आणि इतरांना प्रवेश द्यायचा की नाही यासंदर्भातही बैठकीत चर्चा होणार झाली. मंत्रालयात अभ्यंगताकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जातोय या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
राज्य सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, राज्यातील तब्बल ९६३ शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. (महसूल विभाग)
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.