Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : वाहनांतून उसाची गळती, शेतकऱ्यांचे नुकसान

Team Agrowon

Latest Agriculture News : गावासह परिसरातून विविध कारखान्यांची रात्रंदिवस उसाची वाहतूक सुरू आहे. मात्र उसाच्या वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्या जात आहे. तर दुसरीकडे वाहनात भरलेल्या उसाच्या मोळ्या व्यवस्थित बांधल्या जात नसल्याने वाहनांतून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस पडत आहे. याकडे संबंधित साखर कारखान्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

गावासह परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असून समर्थ, सागरसह समृद्धी कारखान्याच्या वतीने ऊसतोड जोमात सुरू आहे. गावासह परिसरातून रस्त्यांवरून रात्रंदिवस ऊस भरलेली वाहने ये-जा करतात.

दरम्यान काही वाहनधारक ट्रॅक्‍टर आणि मुंगळा या ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून जात असल्याने दररोज रस्त्यांवर वाहनांतून उसाच्या मोळ्या सुटून मोठा ढीग पडत आहे. तर काही वाहनधारक भरलेली ट्रॅक्‍टर वेगाने पळवत असल्यामुळे रस्त्यावर वाहने उलटण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. वाहन उलटल्यास ऊस भरण्यासाठी दुसरे वाहन आणावे लागते. यासाठी दोन दिवस लागत असल्याने ऊस वाळतो.

यामुळे शेतातून भरून गेलेले ट्रॅक्‍टर कारखान्याला जाईपर्यंत कधी-कधी अर्धेही होते. वाहनांतून ऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तर दुसरीकडे रिकामे होऊन आलेली वाहने त्याचप्रमाणे भरलेल्या वाहनांतून मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्याने पाठीमागे पडलेला ऊस किंवा रस्त्यावर उलटलेली ट्रॉलीही वाहनधारकांच्या लक्षात येत नाही.

शिवाय यामुळे अपघातांचा देखील धोका संभवतो. साखर कारखान्यांनी संबंधित वाहनचालकांना, वाहन मालकांना सूचना देऊन रस्त्यावर होणारे उसाचे नुकसान थांबवावे. वाहनांत गाणी वाजवू नये अशी सूचना करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT