Kolhapur Satara Dam Water agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Satara Dam Water : राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला; कोयना, काळम्मावाडी धरणाची जाणून घ्या स्थिती

sandeep Shirguppe

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी होत आहे तर जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी यासह अनेक धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने झपाट्याने पाणी वाढत आहे. तर आज (ता.२५) सकाळी १० वाजता पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४३ फूट १ इंच झाल्याने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच पंचगंगा नदीची मच्छिंद्री झाली. तर राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलीत दरवाजा उघडला आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार राधानगरी धरण ९९ टक्के भरले आहे तर सकाळी १० वाजता ६ नंबरच्या एका स्वयंचलीत दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. स्वयंचलीत दरवाज्यातून १ हजार ४०० क्युसेक्स तर वीज केंद्रातून पंधराशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्येही अतिवृष्टी असून हे धरण ७० टक्क्यांचा पुढे धरणाचा पाणीसाठी झाला आहे. या धरणातील पाणीसाठ्याचा वाढण्याचा वेग अधिक असून १८ टीएमसी इतका पाणी संचय झाला आहे. येथे ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ७० टक्के धरण भरले तरी अद्याप पाणीसाठा किती करायचा, याबाबत निर्णय झालेला नाही. तुळशी धरण क्षमतेच्या ८४ टक्के इतके भरले असून २.८० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

कृष्णेची पातळी दोन फुटांनी वाढली

कृष्णेच्या पातळीत २४ तासांत दोन फुटांनी वाढ झाली. तर तालुक्यातील पंचगंगा, दूधगंगा, वारणा नद्यांच्या पातळीत वाढ सुरू आहे. शिरोळ तालुक्यात चारही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. कृष्णा नदीची सध्या ४२ फुटांच्या पुढे पाणी पातळी असून राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात विसर्ग होत आहे. कृष्णा नदीची इशारा पातळी ५२ फुटांवर असून धोका पातळी ५८ फुटांवर आहे.

वारणा धरण २९.६१ टीएमसी भरले असून वारणेतून आठ हजार ८७४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. आलमट्टी धरण ९१.२६३ टीएमसी इतके भरले असून आलमट्टीत एक लाख ७२ हजार ८०७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आलमट्टीच्या २६ दारांतून दोन लाख पंचवीस हजार क्युसेक पाणी विसर्ग केले जात असल्याची माहिती पांटबंधारे विभागाने दिली.

कोयना धरण परिस्थिती

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज संध्याकाळी ४:०० वा. धरणाची वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १०००० क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार असून आवकेनुसार त्यामध्ये वाढ करणेत येणार आहे.

आज (दि. २५) रोजी सकाळी ८ वा. धरणामध्ये एकूण ७५.२६ टीएमसी ७१.५१ % पाणीसाठा झाला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ११०५० क्युसेक्स असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT