Kolhapur Ambeohol Dam agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Ambeohol Dam : कोल्हापुरात धरणग्रस्तांचा जलसमाधीचा प्रयत्न, तीसरी पिढी संपली तरी न्याय नाही

Ambeohol Dam : गडहिंग्लज प्रांताधिकारी यांना मागच्या काही दिवसांपूर्वी निवेदन देऊनही न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला.

sandeep Shirguppe

Ambeohol Dam Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तूर येथील आंबेओहळ धरणस्थळावर धरणग्रस्तांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी १० जुलै रोजी जलसमाधी आंदोलन करणार असल्याच्या इशारा देऊनही प्रशासनाने कोणतीच पाऊले न उचलल्याने आज (ता.१०) अचानक आंदोलकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस प्रशासनाने आंदोलकांना अडवत जलसमाधी घेण्यापासून रोखले यामध्ये महिलांचीही संख्या मोठी होती.

याबाबत अधिक माहिती अशी, मागच्या काही दिवसांपूर्वी गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयात अधिकारी व धरणग्रस्त संघटनेची बैठक झाली, आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बरेच प्रश्न अजून शिल्लक असून, याबाबत तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात यावेत, अशी मागणी धरणग्रस्त संघटनेने केली होती.

या आंदोलनाबाबत चर्चा व निर्णय वरिष्ठ पातळीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचे आंबेओहळ अन्यायग्रस्‍त, धरणग्रस्त संघटनेचे नेते संजय येजरे यांनी सांगितले.

या प्रकल्पात ८२२ खातेदार आहेत. यापैकी ३५५ शेतकऱ्यांना त्यांची कोणती मागणी नसताना निवाड्यातील सर्व रक्कम उचला व तुम्हाला भरघोस स्वेच्छा पुनर्वसन देऊ, असे आमिष दाखवून तत्कालीन भूसंपादन अधिकारी यांनी तुटपुंज्या रकमेवर शेतकऱ्यांची जमीन संपादन केली. बेकायदेशीर स्वेच्छा निवाडे करून प्रकल्पग्रस्तांना एकरी १ लाख ७ हजार इतके तुटपुंजे अनुदान मंजूर केले. काही सुशिक्षित शेतकऱ्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना न जुमानता निवाड्यातील रकमेपैकी ६५ टक्के रक्कम भरून पर्यायी जमीन किंवा विशेष आर्थिक पॅकेजपोटी एकरी १४ लाख ४० हजार इतके भरघोस अनुदान मिळवले. एक प्रकल्प, एक निवाडा, जमिनीही एकच मग स्वेच्छा पुनर्वसन व आर्थिक पॅकेज यांच्यात फरक का, असा सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तीसरी पिढी तरी न्याय नाही...

पोलीस आणि धरणग्रस्त यांच्यात जोरदार झटापट सुरू होती यावेळी एका धरणग्रस्त बाधीत आपली भावना व्यक्त करताना म्हणाला साहेब आमची तीसरी पिढी न्याय मागत आहे पण आम्हाला अजून न्याय मिळत नाही. मुंबई उच्च न्यायालयात आम्ही दाद मागितली आहे. या सगळ्या लढ्यात माझ्या आईचा मृत्यू झाला अनेक शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवल्या परंतु आम्हाला काही न्याय मिळाला नाही. एवढं सगळं करूनही आमच्या हातात काही मिळत नसेल तर आमच्या जगण्याला अर्थ काय असा सवाल संतप्त तरूणाने व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT