Kalmodi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Kalmodi Dam: कळमोडी धरण जून महिन्यातच तुडुंब

Dam Water Level: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता शंभर टक्के भरले असून, सांडव्यावरून ३२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग आरळा नदीच्या पात्रात होण्यास सुरवात झाली आहे.

Team Agrowon

Khed News: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता शंभर टक्के भरले असून, सांडव्यावरून ३२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग आरळा नदीच्या पात्रात होण्यास सुरवात झाली आहे. मागील वर्षी धरण २१ जुलै रोजी शंभर टक्के भरले होते, मात्र चालु वर्षी धरण तब्बल २७ दिवस आधी म्हणजे २४ जून रोजी भरले आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून जून महिन्यात धरण भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता शुभम सुसुंद्रे यांनी दिली.

चासकमान धरणाच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या खेड तालुक्यातील गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागास वरदान ठरणारे हे धरण आहे. या धरणात सन २०१० पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरवात झाली. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाही. धरण भरताच सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरवात होते.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाव व परिसरात पावसाचा जोर बऱ्यापैकी राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण शंभर टक्के भरले. धरणाच्या सांडव्यावरून ३२ क्युसेकने पाणी आरळा नदीच्या पात्रात विसर्ग होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वेगाने होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

कळमोडी धरणात ४२.८७ द.ल.घ.मी. म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी धरण भरण्यासाठी २१ जुलै हा दिवस उजाडला होता. चालू वर्षी २४ जून हा दिवस उजाडला म्हणजे २७ दिवस लवकर कळमोडी धरण भरले. धरण परिसरात एक जूनपासून ३८३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कळमोडी धरणातून बाहेर पडणारे पाणी चासकमान धरणात येत आहे. त्यामुळे चासकमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे. धरण पातळीवर विभागीय अधिकारी संतोष शिंदे, सहाय्यक अभियंता श्रेणी २ एस. एस. सुसुंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली धरण कर्मचारी चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.

कळमोडी प्रकल्प संघ समितीचे अध्यक्ष व चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे यांनी सांगितले की, चिखलगाव, साकुर्डी देवोशी, कुडे, योणिये, बांगरवाडी या गावांना या धरणाच्या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होत असून, पश्चिम भागातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या कळमोडी प्रकल्पावर अवलंबून आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT