
Satara News : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे मे व जून महिन्यात २० प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. यामध्ये माण आठ, खटाव आठ, कोरेगाव दोन व सातारा तालुक्यातील दोन प्रकल्पाचा समावेश आहे.
हे प्रकल्प द्वारविरहित असल्याने पाऊस असाच सुरू राहिल्यास पुढील काळात या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होणार असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्यांना मे महिन्यापासून पावसाने झोडपण्यास सुरवात केली होती. याचा सकारात्मक परिणाम या तालुक्यातील मोठे व लघु प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात झाला आहे. या दोन तालुक्यातील चार प्रकल्प मे महिन्यात शंभर टक्के भरले होते.
त्यानंतर पाऊस सुरू राहिल्याने माण, खटाव, कोरेगाव व सातारा तालुक्यातील २० प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणाऱ्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू आहे.
यामध्ये माण तालुक्यातील आंधळी, राणंद मध्यम प्रकल्प तर पिंगळी, ढाकणी, लोधवडे, गंगोती, जांभुळणी, महाबळेश्वरवाडी लघु प्रकल्प तर खटाव तालुक्यातील नेर, येरळवाडी हे मध्यम प्रकल्प दरूज, शिरसवडी, मायणी, डांभेवाडी, सातेवाडी,येळीव लघु प्रकल्प तसेच सातारा तालुक्यातील कुमठे, ठोसेघर लघु प्रकल्प, कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी, हिवरे लघु प्रकल्पाचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.