Janai Irrigation Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Janai Irrigation Scheme : जनाई योजनेच्या हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने द्यावे

Irrigation Scheme : योजनेद्वारे पाणी मिळण्याबाबत पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता व खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Team Agrowon

Baramati News : जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाण्याचे आवर्तन सोडावे. योजनेचे हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने दिले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

योजनेद्वारे पाणी मिळण्याबाबत पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता व खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. खडकवासला धरण साखळीतून शेती सिंचनासाठी पाणी देताना पूर्ण क्षमतेने पाणी दिले जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होतो.

योजनेच्या टेल भागातील शेतकऱ्यांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होते. पाणी पट्टीचे पैसे आगाऊ भरूनही या शेतकऱ्यांना प्राधान्य क्रमाने पाणी मिळत नाही. हे शेतकरी पाण्यावाचून वंचित राहतात. जनाई उपसा सिंचन योजनेचे हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने द्यावे. अन्यथा, जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा पाठवलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

पाठवलेल्या निवेदनावर पोपटराव खैरे, ज्ञानेश्वर कौले, राजेंद्र बोरकर, संजय दरेकर, त्रिंबक चांदगुडे, बाबासाहेब बोरकर, बाळासाहेब बोरकर, युवराज गडधे, भानुदास बोरकर, संपत कुतवळ, प्रकाश काळखैरे, जालिंदर कुतवळ आदींसह योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

पिके जळाल्यावर पाणी सोडणार का ?

‘‘सध्या योजनेच्या लाभधारक भागातील ज्वारी सारखी पिके एका पाण्यावाचून जळण्याच्या मार्गावर आहेत. आम्ही काही शेतकऱ्यांनी जनाई योजनेच्या पुण्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, पाणी सोडण्याबाबत अद्याप नियोजन झाले नसल्याचे दिसत आहे,’’ अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पोपटराव खैरे यांनी दिली.

‘‘जनाई योजनेअंतर्गत आंबी, चांदगुडेवाडी, शेरेचीवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी आदी गावांच्या काही भागात अद्याप योजना सुरू झाल्यापासून पाणीच पोचले नाही. या भागातील शेती ओलीताखाली येण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

जनाई उपसा जल सिंचन योजनेद्वारे १५ जानेवारीनंतर पूर्ण क्षमतेने आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. कालवा सल्लागार समितीने रब्बी हंगामातील योग्य पाणीसाठा उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वांची गरज भागेल इतके पाणी मिळेल.
- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT