Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Agriculture Irrigation : पाणीटंचाईला सामोरे जातानाच एप्रिल छाटण्या कराव्या लागत असल्याने टँकरने विकतचे पाणी घालून बागा जगवाव्या लागत आहेत.

Team Agrowon

सूर्यकांत बनकर

Solapur News : करकंब परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईला सामोरे जातानाच एप्रिल छाटण्या कराव्या लागत असल्याने टँकरने विकतचे पाणी घालून बागा जगवाव्या लागत आहेत.

करकंबसह परिसरातील बार्डी, जाधववाडी, पेहे, नेमतवाडी आदी गावांमध्ये द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. बार्डी, जाधववाडी व करकंबच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी तर लाखो रुपयांची कर्ज प्रकरणे करून उजनीच्या डाव्या कालव्यावरून जलवाहिन्या करत द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. परंतु या वर्षी उजनीच्या पाण्याचे हुकलेले नियोजन आणि तीव्र दुष्काळी परिस्थिती याचा द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना सध्या सामना करावा लागत आहे.

द्राक्ष हंगाम संपताच शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करताना बागांची एप्रिल खरड छाटणी करावी लागते. सदर छाटणीनंतरच काडी तयार तयार होत असल्याने पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. परंतु सध्या शेतकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या बोअर आटल्याने त्यांना विकत टँकरने पाणी घालून बागा जगवाव्या लागत आहेत, तर बहुतांश शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरची पाणीपातळी खालावल्याने उपलब्ध असणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे.

अनेक शेतकऱ्यांकडे शेततळी असून त्यातील पाण्यावरच त्यांची भिस्त असून ते संपल्यावर पुढे काय, हा प्रश्नही त्यांच्या पुढे उभा आहे. त्यातच सध्या तापमानाचाही पारा वाढत असल्याने या वर्षी काडी कशी तयार होणार आणि पुढील हंगाम कसा जाणार ही चिंता आतापासूनच लागून राहिली आहे.

आमच्या शेतातील पाण्याचे स्रोत आटल्याने सध्या आम्ही टँकरने विकत पाणी आणून द्राक्षबागा जगवीत आहोत. स्वतःचा ट्रॅक्टर असून दररोज पाचशे रुपयाचे डिझेल आणि प्रतिखेप तीनशे रुपये याप्रमाणे तीन खेपाचे पाण्यासाठी नऊशे रुपये याप्रमाणे प्रतिदिन चौदाशे रुपये इतका खर्च येतो.
- महेंद्र घाटुळे, द्राक्ष बागायतदार, करकंब,
आम्ही सात किलोमीटर अंतरावरील उजनीच्या डाव्या कालव्याजवळ बोअर घेऊन पाइपलाइन करून तीन एकर द्राक्षबाग लावली आहे. सध्या खरड छाटणी केलेली असतानाच, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे शेततळ्यात साठवलेल्या पाण्यावरच पूर्ण भिस्त आहे.
- संतोष बनकर, द्राक्ष बागायतदार, बार्डी
माझी सहा एकर द्राक्षबाग आहे. परंतु सर्वच बोअरची पाणीपातळी कमालीची घटली असून, केवळ पंधरा ते वीस मिनिटेच चालतात. त्यामुळे करकंब भागातील द्राक्षबागा सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. या भागातील पाणीप्रश्न कायमचा मिटवायचा असेल काहीही करून गावतळ्यात पाणी आणले पाहिजे.
- पांडुरंग व्यवहारे, द्राक्षबागतदार, करकंब

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT