Agricultural Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Management : वाफसा, पाण्याचा ताण अभ्यासून सिंचन व्यवस्थापन गरजेचे

Water Stress : द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज वाढत जाते. त्यामुळे योग्य वाफसा व पाण्याचा ताण अभ्यासून सिंचन व्यवस्थापन गरजेचे आहे.

Team Agrowon

Nashik News : द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज वाढत जाते. त्यामुळे योग्य वाफसा व पाण्याचा ताण अभ्यासून सिंचन व्यवस्थापन गरजेचे आहे. छाटणी केल्यानंतर वाढ कमजोर झाल्यास व सबकेन फुटून आल्यानंतर त्यातील समस्या कमी करण्यासाठी नियंत्रित सिंचन पद्धती गरजेची आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन केल्यास घड चांगले निघतात, असे मत द्राक्ष तज्ञ अरविंद खोडे यांनी मांडले.

‘अॅग्रोवन’च्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त अॅग्रोवन व IQAS इंटिग्रेटेड क्विक अॅग्री सोल्यूशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (ता. २२) रोजी कादवा कारखाना येथे ‘कमी पाण्यात द्राक्षबाग व भाजीपाला पीक नियोजन व दर्जेदार घड निर्मितीसाठी एप्रिल छाटणीच्या कामाच्या पद्धती’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी खोडे बोलत होते. यावेळी इंटिग्रेटेड क्विक अॅग्री सोल्यूशन प्रा. लि. चे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर मुक्तेश्वर राजदेव, सेल्स हेड प्रमोद नाजगड, गेन्स ग्रुपचे अध्यक्ष सत्यवान काशीद यासह प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना खोडे म्हणाले, की द्राक्षबागेची खरड छाटणी केल्यानंतर बागेतील पृष्ठभाग हा तापत असतो. यासह पाण्याचे बाष्पीभवन असे वेगळे वाटतो त्यामुळे ओलावा टिकून ठेवण्यासह बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी अशा ठिकाणी सेंद्रिय आच्छादन पद्धतीचा अवलंब करून पाचट हिरवळीचे खत फायदेशीर ठरते. मृदा उपाय केल्यानंतर मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढत असते. यासह सेंद्रिय आच्छादन, कंपोस्ट खत शेणखत याचा उपयोग फायदेशीर ठरतो.

यावेळी कादवा कारखाना परिसरातील द्राक्ष व भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲग्रोवनचे नाशिक बातमीदार मुकुंद पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर ॲग्रोवनचे वितरण प्रतिनिधी रोहन कोर यांनी आभार मानले.

मातीचा जिवंतपणा महत्त्वाचा

रासायनिक खताचा अधिक व सातत्‍याने वापर केल्‍यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्‍पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्‍यास पिकांना पाणीही मोठया प्रमाणावर द्यावे लागते. साहजिकच त्‍यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते.त्यामुळे मुळापर्यंत पाणी जाणे गरजेचे आहे.

पाण्यासह सूक्ष्मअन्नद्रव्य मातीच्या कणासोबत धरून ठेवून त्याची उपलब्धता पिकांना होणे गरजेचे आहे. यासह जमिनीचे आरोग्य- भुसभुशीतपणा, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण, सामू भारता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता याबाबत इंटिग्रेटेड क्विक अॅग्री सोल्युशन प्रा. लि. चे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर मुक्तेश्वर राजदेव यांनी माहिती दिली. यावेळी मृदा उपचार व कृषी निविष्ठांचा वापर अचूक कसा करावा याबाबत प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT