Team Agrowon
पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वाढीच्या संवेदनशील काळात सिंचन अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे.
पाण्याची उपलब्धता असल्यास फुलोरा अवस्थेत पिकाला अवश्य सिंचन करावे.
लागवडीनंतर साधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी पीक फुलोऱ्यात येते. या अवस्थेत सिंचन केल्यास कणसात दाणे भरण्यास मदत होते
भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाणी, मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.
जिरायती हरभरा क्षेत्रात ओलावा खूप कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर फुले येऊ लागताच पाणी द्यावे.
करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस कमी पाणी लागते.