Agriculture Development Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Development : शेती विकासाला महिला बचत गटातून ‘इर्जिक’ शक्ती

Women Self Help Group : महिला एकत्र आल्यावर शेती विकासाला चांगली गती मिळते हे पिंपळगाव कोंझिरा (ता. संगमनेर) येथील महिला बचत गटाने दाखवून दिले आहे. दोन वर्षांत बचत गटाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील पन्नास गावांतील दीड हजारापेक्षा अधिक महिला एकत्रित आल्या आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : आजही शेतीचा बराचसा भार महिलांवर अवलंबून आहे. महिलांना शेतीमधील नवीन तंत्रज्ञान फारसे अवगत नसल्याने पीक व्यवस्थापनात अडचणी येतात. हे लक्षात घेऊन ‘पाणी फाउंडेशन’ने महिलांना शेतीत सक्षम करण्यासाठी महिला बचत गट तयार केले. तीन वर्षांत संगमनेर तालुक्यात सुरू झालेल्या या चळवळीतून पन्नास गावात सुमारे १०५ बचत गट तयार झाले. या महिला आपापल्या गावात वेगवेगळे उपक्रम राबवितात. या महिलांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे.

उत्पादन खर्च नियंत्रणावर भर

संगमनेर तालुक्यातील बचत गटातील महिला पंधरा ते वीस एकरांवर सामूहिक शेती करत आहेत. प्रत्येक महिलेचे किमान एक एकर क्षेत्र तरी सामूहिक शेतीत असावे असा त्यामागचा उद्देश आहेत. सामूहिक शेती करताना रासायनिक खतांचा कमी वापर केला जातो. गांडूळ खत तयार केले जाते. सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर महिलांचा भर आहे.

संगमनेर तालुक्यात प्रामुख्याने मका, भाजीपाला, कांदा, कापूस आणि फळपिकांची लागवड आहे. संबंधित गावात गटातील दहा ते पंधरा महिला एकत्रित येऊन पेरणी, मशागत, फवारणी, खुरपणीपासून पीक काढणीपर्यंत ‘इर्जिक’ पद्धतीने कामे करतात. त्यामुळे चार दिवसांचे काम एका दिवसात होते. यामुळे वेळ, मजूर आणि पैशांची बचत होते. अनेक गटातील महिला टॅक्टर चालवितात. बियाणे, खते आणि अन्य निविष्‍ठांची एकत्रित खरेदी, विक्रीतून आर्थिक बचत होते. महिलांच्या एकत्रित शेतीतून संगमनेर तालुक्यात १० ते १५ कोटींची उलाढाल होते. एकत्रित कामांमुळे मजुरी, जैविक खत उत्पादन आणि अन्य बाबींतून दोन कोटींपेक्षा अधिक बचत झाली आहे.

पशुपालनास चालना

संगमनेर तालुक्यातील साठ गावातील बचत गटाच्या माध्यमातून दीड हजार महिला जोडल्या आहेत. त्यातील ७०० पेक्षा अधिक महिला पशुपालन करतात. याबाबत मोहन गवांदे म्हणाले, की लागवड, खत व्यवस्थापनाचे मार्गदर्शन, मजूरटंचाईवर मात करत एकात्मिक शेतीमुळे मका उत्पादनात वाढ झाली. मक्यापासून मुरघास बनविल्याने चाराटंचाईवर मात करता आली. यामुळे पशुपालनास चालना मिळाली. तीन वर्षांत साधारण चाळीस टक्के पशुपालन वाढले आहे. यातून महिलांना चांगली मिळकत होत आहे. शेतीविकास आणि सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या गटाला ‘वॉटर कप’ स्पर्धेतून बक्षीस दिले जाते.

मुरघास उत्पादनास सुरवात

पिंपळगाव कोंझिरा (ता. संगमनेर) येथील प्रज्ञा करपे म्हणाल्या, की आम्ही पंधरा एकरांवर एकत्रित शेती करतो. आमच्या कृषी सखी महिला शेतकरी महिला बचत गटातील पंधरा महिलांना कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. आम्ही सुरुवातीला मक्याचे एकत्रित उत्पादन घेऊन मुरघास केला. मक्याचे एकरी १८ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. त्यानंतर कांद्याचे उत्पादन घेतले. येत्या काळात आम्हाला वृक्ष रोपवाटिका करायची आहे.

गटामार्फत आम्ही पंधरा एकरांवर एकत्रितपणे कापूस लागवड करतो. पूर्वी आम्हाला एकरी १२ क्विंटलपर्यंत कापूस उत्पादन मिळायचे. आता एकत्रित कामांमुळे वेळेवर मशागत आणि अन्य बाबींमुळे एकरी १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कुटुंबाला आर्थिक फायदा झाला. मजूरटंचाईवर मात करता आली.
सविता खेमनर, चणेगाव. ७७४१०८२७४७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT