Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : भात, नाचणीसाठी विमा कवच

PM Insurance Scheme : नैसर्गिक आपत्तीत नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना दिलासा आणि मदतीचा हात मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे.

Team Agrowon

Thane News : नैसर्गिक आपत्तीत नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना दिलासा आणि मदतीचा हात मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. त्यानुसार कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडीद या पिकांसाठी पीकविमा कवच मिळणार आहे. यासाठी १५ जुलै ही अंतिम मुदत असून, त्या‍चा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेत पीकविमा उतरवावा, अशी आवाहन कोकण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली आहे.

खरीप हंगाम २०२४ साठी पीकविम्यासाठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडीद पिकांसाठी पीकविमा उतरवता येणार आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवसआधी बँकेत सादर करावे.

घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल, असेही माने यांनी कळवले आहे. ठराविक पिकांसाठी अधिसूचित असणाऱ्या महसूल मंडळामधील शेतकरी त्या पिकाचा विमा उतरवू शकतील. ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तर पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस.जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीकविमा योजना राबवण्यात येणार आहे.

ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्हा भातपीक विमा संरक्षित रक्कम ५१ हजार ७६० रुपये हेक्टर, रत्नागिरी जिल्हा भात पीकविमा संरक्षित रक्कम ५० हजार रुपये हेक्टर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा नाचणी पीकविमा संरक्षित रक्कम २० हजार रुपये हेक्टर, पालघर जिल्हा उडीद पीकविमा संरक्षित रक्कम २५ हजार रुपये हेक्टर; तसेच ई-पीक पाहणीद्वारे नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीअंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे.

विविध जोखमीअंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनातील अटी व शर्तींना अधिन राहून निश्चित केली जाणार आहे, असे माने यांनी सांगितले.

ही कागदपत्रे आवश्यक

खरीप हंगाम २०२४ साठी सहभागाची अंतिम मुदत १५ जुलै आहे.

पीकविम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडावेत.

पीकविमा पोर्टल, विमा कंपनी संकेतस्थळ, बँक, सहकारी पतसंस्था, पीकविमा ॲप इत्यादी माध्यमांद्वारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात.

पीकविमा योजनेचे अर्ज भरताना बँकांमधील गर्दी टाळावी, याकरिता जनसुविधा केंद्रामार्फत (सी.एस.सी.) ऑनलाइन पद्धतीने पीकविमा अर्ज दाखल करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT