Dharashiva News: उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्हा प्रशासनाने पाणी नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. मानवी तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. चालू उन्हाळ्यात पिण्यासाठी ६.४३८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. तर एकूण १७ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उन्हाळी पिकांच्या संरक्षणासाठी १६०.०५१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी १४७.७२७ दलघमी पाणीसाठा सिंचनासाठी उन्हाळी हंगामात वापरण्यात येणार आहे. तसेच उन्हाळ्यानंतरही २२ दलघमी पाणीसाठा प्रकल्पात शिल्लक ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. .जिल्ह्यातील वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागाची पाण्याची गरज लक्षात घेता, प्रशासनाने २०२६-२७ या वर्षासाठी ६.४३८ दलघमी पाणी बिगर सिंचन (पिण्यासाठी) वापरासाठी प्रस्तावित केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक ३.९३१ दलघमी साठा मध्यम प्रकल्पांतून राखीव असेल. लघु तलावांमधून १.६४८ दलघमी, तर मोठ्या प्रकल्पांमधून ०.५४९ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. इतर साठवण तलावांतूनही ०.३१० दलघमी पाणी पिण्यासाठी राखून ठेवले जाणार आहे..दरम्यान, जिल्ह्यासाठी प्रस्तावित असलेल्या या कार्यक्रमांतर्गत एकूण १७ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उन्हाळी पिकांच्या संरक्षणासाठी १६०.०५१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून त्यापैकी १४७.७२७ दलघमी पाणीसाठा सिंचनासाठी उन्हाळी हंगामात वापरण्यात येणार आहे. या पाण्याचा वापर करून उन्हाळी हंगामात एकूण १७ हजार ४७४ हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्याचे उद्दिष्ट आहे..Summer Irrigation: ‘चासकमान’चे उन्हाळी आवर्तन त्वरित द्या.पाण्याचे वाटप हे मुख्यत्वे कालवा प्रवाही आणि जलाशय उपसा या दोन पद्धतीने केले जाणार आहे. कालव्याद्वारे एकूण ६,४३१ हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जाईल. तर जलाशयावरून उपसा सिंचन पद्धतीने ११ हजार ४३ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे..Summer Irrigation: खडकवासला कालव्यातून इंदापूरला सोडलेले आवर्तन बंद .उन्हाळी हंगामात सिंचनासाठी एकूण १४७.७२७ दलघमी पाणी वापरले जाईल. कालवा प्रवाही सिंचनासाठी ७२.२७९ दलघमी, तर उपसा सिंचनासाठी ७५.६८० दलघमी पाणी खर्च होण्याचा अंदाज आहे..बाष्पीभवनामुळे घट होण्याचा अंदाजउन्हाळ्यात उष्णतेमुळे होणारी पाण्याची घट हा चिंतेचा विषय आहे. प्रशासकीय अंदाजानुसार, उन्हाळी हंगामात बाष्पीभवनामुळे तब्बल ३०.३११ दलघमी पाणी घटण्याची शक्यता आहे. सर्व प्रकल्प मिळून १ मार्च रोजीचा एकूण उपयुक्त साठा २१६.४९१ दलघमी इतका आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.