Sustainable Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Agriculture : शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजनांची गरज

Agriculture Development : राष्ट्रीय परिसंवादातून चर्चेचा फायदा शेतकऱ्यांनाच नव्हे तर कृषी क्षेत्रासाठी चांगली धोरणे तयार करणाऱ्यांनाही होईल.

Team Agrowon

Ahilyanagar News : राष्ट्रीय परिसंवादातून चर्चेचा फायदा शेतकऱ्यांनाच नव्हे तर कृषी क्षेत्रासाठी चांगली धोरणे तयार करणाऱ्यांनाही होईल. या परिषदेमध्ये कृषी व्यवसाय आणि उद्योजकता विकास, नावीन्यपूर्ण विपणन धोरण, मूल्यवर्धन आणि कृषी प्रक्रिया, हवामान स्मार्ट शेती, कृषी तंत्रज्ञान आणि डिजिटल शेती या विषयावर चर्चा होऊन शेतीच्या शाश्‍वत विकासाकरिता नावीन्यपूर्ण उपाययोजनांची गरज आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी अर्थशास्त्र विभाग व अकोला येथील महाराष्ट्र सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चर इकोनॉमिक्स यांचे संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘ग्रामीण समृद्धीसाठी नावीन्यपूर्ण संशोधन व उद्योजकता ः कृषी दृष्टिकोन’ या विषयावरील राष्ट्रीय अर्थ परिसंवाद कार्यक्रमात प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे यांनी मार्गदर्शन केले.

सरकारच्या कृषी मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय पॉल शर्मा, राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे होते. या वेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले,

महाराष्ट्र सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चर इकोनॉमिक्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. साळे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. आर. जी. देशमुख, अकोला येथील सोसायटीचे कोषाध्यक्ष डॉ. एस. सी. नागपूरे, विविध कृषी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कदम, डॉ. माने, डॉ. मोरे, डॉ. तोरणे, आयोजन समितीचे सचिव डॉ. रोहित निरगुडे उपस्थित होते.

या वेळी डॉ. विजय पॉल शर्मा, डॉ. डी. एल. साळे, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिले यांनी मार्गदर्शन केले. कृषी अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव कासार व अकोला कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. डी. एल. साळे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. रोहित निरगुडे यांनी करून उपसंशोधन संचालक डॉ. पी. एन. शेंडगे यांनी मानले.

हवामान बदलावर तंत्रज्ञान हवे : पटेल

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्र पटेल म्हणाले, ‘‘भारतीय शेती क्षेत्रात होऊ घातलेल्या हवामान बदलास तोंड देण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा आविष्कार करणे गरजेचे आहे. तसेच कृषी शास्त्रज्ञांनी याविषयी अधिकाधिक संशोधन करणे व ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT