Summer Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Paddy Farming : पेण तालुक्यात उन्हाळी दुबार भातशेतीच्‍या लागवडीत वाढ

Paddy Farming : तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाण्यामुळे पूर्व विभागातील असंख्य शेतकरी उन्हाळी दुबार भातशेती पिकाकडे वळले आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या आर्थिक उत्‍पनात वाढ झाली आहे.

Team Agrowon

पेण : तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाण्यामुळे पूर्व विभागातील असंख्य शेतकरी उन्हाळी दुबार भातशेती पिकाकडे वळले आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या आर्थिक उत्‍पनात वाढ झाली आहे. हेटवणे धरणाच्या पाण्याचा फायदा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तालुक्‍यात ऐन उन्हाळ्यातही भातशेती बहरली आहे.

एकेकाळी रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता, मात्र वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे येथील शेतकरी आता शेतीपासून दूर जाऊ लागला आहे. काही तालुक्यांतील बहुतांश शेतकरी आता दुबार शेतीपिकाकडे वळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील हेटवणे धरणाच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे खारेपाट वगळता इतर अनेक गावांना सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. त्‍यामुळे पूर्व भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेतीबरोबर भाजीपाला, वेलवर्गीय अशा विविध पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

येथील कामार्ली, तळवली, आधारने, सापोली, शेणे, बोरगाव या भागातील शेतकरी सध्या उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत. तालुक्याच्या कृषी विभागाच्या अंतर्गत सहा हजार ६६८ हेक्टर क्षेत्रांपैकी एक हजार ७०० ते ८०० हेक्टर भातशेतीची लागवड करण्यात येत आहे. खारेपाटात पाण्याअभावी नुकसान सहन करावे लागत असल्याने नाराजी आहे.

तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी कालव्याद्वारे शेतीला मिळत असल्याने येथील असंख्य शेतकऱ्यांनी पावसाळी भातशेतीपेक्षा उन्हाळी भातशेती लावली आहे. त्यात भातशेतीमध्ये चांगले पीक आले असून, त्‍याबरोबर भाजीपाल्याचीसुद्धा लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याचा फायदा होत आहे.

-नितेश जाधव, शेतकरी, पूर्व विभाग

हेटवणे धरणाचे सिंचनाचे पाणी गेली ३५ वर्षे पेण खारेपाटातील शेतकऱ्यांच्या सातबारावर अधोरेखित असताना त्‍यांना हक्काच्या पाण्यापासून शासनाने वंचित ठेवले आहे. दुसरीकडे पूर्व भागातील शेतकऱ्यांना कालव्याद्वारे पाणी मिळत असल्यामुळे तेथील शेतकरी विविध पिके घेऊन समृद्ध झाले आहेत. मग हा अन्याय फक्त खारेपाटातील शेतकऱ्यांवर का?

-अभिमन्यू म्हात्रे, शेतकरी खारेपाट विभाग

कालव्याच्या पाण्यामुळे बहरली शेती

रोहा ः उन्हाळी भातशेती लागवडीची कामे जवळपास पूर्ण झाली असून गतवर्षीप्रमाणे यंदाही चांगले पीक येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. रोहे तालुक्यातील धाटाव, वरसगाव, पुगाव, खांब, मुठवली, धानकान्हे या परिसरात कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी पिके घेतली जातात तर धाटाव व बाहे परिसरामध्ये काही ठिकाणी भाजीपाल्याची लागवड केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT