Water shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Water Crisis : राज्यात विविध जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या झळांचा फटका सर्वसामान्यांसह धरणांदेखील बसत आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे पाणीटंचाईचे संकट अनेक जिल्ह्यांवर आले असून पाण्यासाठी नागरींकाना भटकावे लागत आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात वाढत्या तापमानाचा फटका सर्वसामान्यांसह धरणांना देखील बसत आहे. राज्यातील सर्व मोठ्या धरणातील पाणीसाठा जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार २८.९९ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या वर्षी याच दिवशी ४० टक्क्यांहून अधिक होता. मात्र यंदा वाढत्या उन्हामुळे विविध जिल्ह्यात पारा ४० शी पार गेल्याने धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे छ. संभाजी नगरकरांची चिंता वाढवली असून येथील पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या ९.९८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर दररोज पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ होत आहे. धाराशिव जिल्ह्याला देखील टँकर आणि आधिगृहनचा आधार घ्यावा लागत असून येथे १०० हून अधिक टँकर प्रशासनाकडून फिरवले जात आहेत. तसेच अधिगृहन देखील वाढण्यात आले आहेत. 

जायकवाडी धरणातील पाणीसाठा

राज्यात वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे धरणातील पाण्यासाठ्यात घट होत आहे. छ. संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण (जायकवाडी) धरणातील पाणीसाठी १० टक्क्यांच्या खाली आला असून तो ९.९८ टक्के आहे. यामुळे छ. संभाजी नगर जिल्ह्यातील ३६१ गावे आणि ५६ वाड्यावस्त्यांना ५६९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

पाण्याचे बाष्पीभवन 

राज्यात वाढलेल्या तापमानामुळे जायकवाडी धरणातील दररोज ५२० एम.एल.डी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे समोर आले आहे. शहराला ४ दिवस पाणी पुरवठा होईल इतक्या पाण्याची वाफ होत आहे. यामुळे शहर वासियांसह ग्रामिण भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे. 

आधिगृहनचा आधार 

वाढत्या तापमानाचा फटका धाराशिव जिल्ह्याला बसत आहे. येथे ६४ गांवामध्ये भीषण पाणीटंचाई भासत असून १०१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. २६४ गावातील नागरीकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने ५५५ विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहन केले आहे. कोरडे पडलेले प्रकल्प आणि पाण्याची मागणीमुळे नागरीकांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

उष्णतेची लाट 

दरम्यान वाढत्या तापमानाच्या झळांमुळे हैराण झालेल्या नागरीकांसाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरसह तळ कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच पारा ४० ते ४२ अंशावर जाण्याची देखील शक्यता वर्तवताना नागरीकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे देखील आवाहन हवमान विभागाकडून करण्यात आले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT