Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Update : सांगलीत मध्यम, लघू प्रकल्पांतील साठा ३ टक्क्यांनी वाढला

Water Stock : सांगली जिल्ह्यात मध्यम व लघू प्रकल्पांची संख्या ८३ इतकी आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकल्पात १०४४ दशलक्ष घनफूट म्हणजे १३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात मध्यम व लघू प्रकल्पांची संख्या ८३ इतकी आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकल्पात १०४४ दशलक्ष घनफूट म्हणजे १३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. जून महिन्यातील सलग अकरा दिवस सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पात १९१ दशलक्ष घनफूटने पाणी साठ्यात वाढ झाली असून १२३५ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे. ८३ प्रकल्पांत १६ टक्के पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात मध्यम ५, तर लघू ७८ असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता ९४४०.२० दशलक्ष घनफूट इतकी आहे. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने या प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून या प्रकल्पातील शेतीसह पिण्यासाठी पाणी उपसा सुरू झाला होता. परिमाणी पाणी साठा झपाट्याने कमी होत चालला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकल्पात १३ टक्के म्हणजे १०४४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. या दरम्यान, २० प्रकल्प कोरडे पडले होते. तर २४ प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र निर्माण झाली होती. पाणी कमी होत चालल्याने अजून प्रकल्प कोरडे पडण्याची भीती निर्माण झाली होती.

जिल्ह्यात सर्वदूर जून महिन्यात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तासगाव आणि खानापूर या तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे कोरडे असणाऱ्या प्रकल्पात पाणीसाठा झाला. तासगाव तालुक्यातील एक, आटपाडी तालुक्यातील चार प्रकल्प कोरडे होते. या पावसामुळे तासगाव तालुक्यातील एक तर आटपाडी तालुक्यातील दोन प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे.

सद्यःस्थितीला एक प्रकल्प पूर्ण क्षमेतेने भरला आहे. चार प्रकल्पात ७५ टक्केपेक्षा जास्त, पाच प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, अकरा प्रकल्पांत २५ ते ५० टक्के तर २६ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. तसेच प्रकल्पात पाणीसाठा वाढत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण आहे. मात्र, जत तालुक्यात पाऊस असला तरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढला नाही. जतमध्ये २७ प्रकल्प असून ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तालुकानिहाय प्रकल्प दृष्टिक्षेप

तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा (दशलक्ष घनफूट) टक्के

तासगाव ७ ६७.६३ १२

खानापूर ८ ६८.९१ १३

कडेगाव ७ २४९.४७ ३९

शिराळा ५ ११८.९३ १३

आटपाडी १३ ४७२.९८ ४१

जत २७ १५४.०४ ५

कवठेमहांकाळ ११ ८२.०१ १०

मिरज ३ १८.३६ १५

वाळवा २ ३.३३ ७

एकूण ८३ १२३५.६५ १६

प्रकल्पातील १३ टक्क्यांवरून १६ टक्के पाणीसाठा वाढला

पावसामुळे तीन तलावांत पाणीसाठा झाला

मृत पाणीसाठा प्रकल्पांची संख्या झाली कमी

गवतर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी पाणीसाठा कमीच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT