Water Scarcity : खानापूर तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली

Water Crisis : खानापूर तालुक्यात जलसाठे संपुष्टात येऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने वाढू लागली आहे.
Water Crisis
Water Crisis Agrowon

Sangli News : खानापूर तालुक्यात जलसाठे संपुष्टात येऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने वाढू लागली आहे. तालुक्यातील ऐनवाडी, घोटी खुर्द, रेवणगाव, घाडगेवाडी गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी खानापूर पंचायत समिती प्रशासनाने चार गावांत विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. याचे पाणी सार्वजनिक विहिरीत सोडून ग्रामस्थांना पुरविले जात आहे. खानापूर तालुक्यात या वर्षी कमी पर्जन्यमान झाले आहे. विहिरी, तलावातील सध्या उपलब्ध असलेले जलसाठे संपुष्टात येऊ लागले आहेत.

Water Crisis
Water Scarcity : शिंदखेडा तालुक्यात टंचाईची समस्या

तलावाखाली असणाऱ्या सार्वजनिक विहिरीतील पातळी खालावू लागल्याने पिण्याच्या पाण्यावर याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ऐनवाडी, घोटी खुर्द, रेवणगाव, घाडगेवाडी गावांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी तहसीलदारांना मागणी पत्र दिले होते.

Water Crisis
Water Scarcity : पाणीटंचाईच्या झळा वाढल्या

त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाने ऐनवाडी, घोटी खुर्द व घाडगेवाडी येथे प्रत्येकी एक व रेवणगाव येथे दोन विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. विंधन विहिरींद्वारे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

वरील चार गावांसह अन्य गावांतही पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत. पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. दरम्यान, जनावरांच्या चाऱ्यांची टंचाई सुरू आहे. जनावरांसाठी पशुपालक वैरण विकत घेऊन जनावरे जगवू लागल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com